Pathlag (पाठलाग)
चंद्रलेखा बेलसरे यांनी मराठी कथेच्या प्रांतात आपला स्वतंत्र ठसा उमटविला आहे. ‘सत्यापितम’ आणि ‘सत्याभास’ या दोन महत्त्वाच्या गूढ कथासंग्रहानंतर त्यांचा ‘पाठलाग’ हा दमदार कथासंग्रह आलाय. त्यांनी लोकनायक महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे चरित्र, आर्यमा, अनुभूती, अरूणिमा, अंतहीन, अभिजात अशा कवितासंग्रहांनी मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले आहे. नजिकच्या काळात त्यांची आणखी काही पुस्तके वाचकांच्या भेटीस येत आहेत.