Vadal Matha Te 1965 Bharat-Pak Yuddha (वादळ माथा त
२० नोव्हेंबर, १९६२ ला यशवंतराव चव्हाण भारताचे 'सरंक्षण मंत्रिपद' भुषविण्यासाठीच दिल्लीला गेले. 'हिमालयाच्या संरक्षणसाठी सह्याद्री' या शब्दात मराठी जानतेने त्यांना निरोप दिला. पण दिल्लीत दाखल झाल्यानंतर सह्याद्रिला काय मनोव्यथा सहन कराव्या लागल्या याची जाणीव जनतेला झाली नाही. यशवंतरावांनी सर्व व्यथा सहन केल्या व एका वर्षात पंडित नेहरूंचा विश्वास व दिल्लीत आपले विशिष्ट स्थान प्रस्थापित केले. चीन विरुद्ध १९६२ मधील युधातिल पराभवानंतर यशवंतरावांनी सैन्याचे बल व मनोधेर्य उच्वान्यसाठी विशेष प्रयत्न केले, तसेच सैन्याला लागणारी सामुग्री, स्वयंचालित बंदुका, दारूगोळा व सर्व निर्माण करण्यासाठी निरनिराळ्या ठिकाणी कारखाने उभारण्याचे कार्य तत्परतेने पार पाडले त्यामुळे १९६५ च्या भारत-पाक युद्धामध्ये भारताला विजय मिळाला. ताश्कंदमध्ये सापडतील. या सर्व घटनांचा व युद्धानंतरच्या राजकीय घडामोडी उहापोह राम प्रधान यांनी या पुस्तकात केला आहे.