Mumbai Dangal Ek Vishleshan (मुंबई दंगल एक विश्लेष
मुंबईमध्ये १९९२ च्या डिसेंबरमध्ये आणि १९९३ च्या जानेवारीत भीषण जातीय दंगली झाल्या. त्याच वर्षी मार्चमध्ये बॉम्बस्फोट झाले. दंगल आणि बॉम्बस्फोटाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या न्या. बी. एन. श्रीकृष्ण यांच्या आयोगाने यासंबंधीचा अहवाल राज्य सरकारला १९९८ मध्ये सादर केला. तो सादर करण्यापूर्वी सरकारने टाळाटाळ केली होती. या सगळ्याचे पत्रकार म्हणून अवलोकन करणारे निखिल वागळे यांचे हे पुस्तक आहे. पुस्तकात पहिल्या भागात त्यांनी वस्तुस्थिती आणि विपर्यास सांगितला आहे. श्रीकृष्ण अहवाल, पोलिस दल, पत्रकारांची भूमिका, अपुरी शस्त्रास्त्र आणि जातीयवादी मनं आदी मुद्यांवर त्यात भाष्य आहे. दुसऱ्या भागात थैमानाच्या कहाण्या आहेत. खाकी वर्दीतील अत्याचार दाखवले आहेत.