Aadim Dukhhache Vartul (आदिम दुःखाचे वर्तुळ)

By (author) Bharati Patil Publisher Pratibha

लोकगीतांची शब्दकळा स्वतःमध्ये मुरवून घेऊन आधुनिक युगातील जगण्याचा वेध घेणारी सशक्त कविता भारती पाटील यांच्या 'आदिम दुःखाचे वर्तुळ' या संग्रहातून भेटते. ग्रामजीवनातील चैतन्याने रसरसलेल्या जगण्याबरोबरच तिथले दुःख-दैन्य कवेत घेणारी ही कविता मनाचा ठाव घेते. कोणतीही चांगली कविता वाचकांना आपल्या गद्य जगण्यापलीकडच्या भावविश्वात सहजपणे घेऊन जात असते. भारती पाटील यांची कविता त्या निकषावर अस्सल ठरते. घासातला घास खाऊ म्हणताना कुणीही परका नसल्याचे सांगताना ही कविता माणसांमाणसांमध्ये उभ्या केल्या गेलेल्या सगळ्या भिंतींना पार करून जाते.

Book Details

ADD TO BAG