कशा कशाच्या नावाने
डिसेंबर १९९२: इरा दीक्षित आणि ओमर सिद्दिकी ही मुंबईत राहणारी स्वप्नाळू आणि खेळकर, किशोरवयीन जोडी होती. अयोध्येत सुरू असलेल्या दंगलींचे तीव्र पडसाद मुंबईमध्ये उमटल्यामुळे त्या दोघांचंही आयुष्य उध्वस्त झालं. डिसेंबर २०१७: लंडनमध्ये स्थायिक झालेली डॉ. इरा गोडसे आणि तिचा मुलगा समीर, विमानातून अस्थिकलश घेऊन, मुंबईत येतात. सूडाच्या भावनेने पेटलेला, गांधीहत्येला जबाबदार असणाय नथुराम गोडसेंचा, त्यांच्या कुटुंबाशी असलेला संबंध शोधून काढण्याची शपथ घेत समीर फरार होतो. इरा आपल्या मुलाचा वेडीपिशी होऊन शोध घेते. तिचा हा शोध अखेरीस पोलंडला येऊन संपतो. या प्रवासात तिला ध्रुवीकरण झालेलं वेगळंच जग दिसतं. त्या जगात आपलं अस्तित्त्व टिकवून ठेवण्याच्या नावाखाली वर्ण, देवदेवता, मूर्तिपूजक, मूर्तिभंजक, गायी, डुकरं यांच्या नावाखाली एकमेकांशी संघर्ष करणारे लोक आढळतात. About the Author: मंजिरी गोखले जोशी या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या साईद बिझनेस स्कूलमधील विविधता आणि समावेशन विभाग प्रमुख आणि ग्लोबल टॅलेंट ट्रॅकच्या माजी सीईओ आहेत. मंजिरी त्यांच्या एलिफंट कनेक्ट या कंपनीद्वारे लोकांना नेतृत्व प्रशिक्षण देतात. त्यांची लिंक्डइनमार्फत, सर रिचर्ड ब्रेन्सन (व्हर्जिनचे संस्थापक) यांच्यासाठी योग्य उद्योजकांची निवड करणाऱ्या सल्लागार समितीमध्ये निवड करण्यात आली होती. त्यांनी वृद्ध लोकांसाठी माया केअर नावाची धर्मादाय संस्था सुरू केली. त्या संस्थेचे नेतृत्व करणाऱ्या दिव्यांगांच्या गटाला त्यांनी नेतृत्व प्रशिक्षणाचे धडे दिले. या कार्यासाठी त्यांना 'शी इन्स्पायर्स' तर्फे 'एजंट ऑफ चेंज' या इंग्लंडच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमधून 'मेजर प्रोग्राम मॅनजमेंट' या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे, तसेच ब्रिटिश उच्च आयोगाची 'शेवनिंग' शिष्यवृत्तीही मिळवली आहे. त्यांच्या (मॅकग्रा हिल, सेज) पुस्तकांचा उपयोग नेतृत्व प्रशिक्षणासाठी केला जातो. हे त्यांचे सहावे पुस्तक आहे. सौ. मंजिरी यांचा श्री. अभय जोशी यांच्याशी विवाह झाला आहे. त्यांना तन्वी व मही या दोन मुली आहेत.