-
Aadhunik Yugat Islami Jeevanshaili (आधुनिक युगात इ
आधुनिक युगात इस्लामी जीवनशैली आजच्या काळात वेगवेगळ्या धर्मांच्या लोक, वेगवेगळ्या राष्ट्रात नांदत असताना इस्लामचे धार्मिक नियम,उपासना-आराधना पद्धती राष्ट्रनियमांच्या विरोधात न जाता कशा पाळाव्यात,त्यात कालानुरूप बदल कसे करावेत याचे मागदर्शन करणारे पुस्तक. गणित, विज्ञान, खगोलशास्त्रे, आंतरराष्ट्रीय कायदे, वैद्यकशास्त्र अशा विविध ज्ञानशाखांची पायाभरणी इस्लामी विद्वानांनी केली आहे. इस्लामची मुलभूत तत्वे मानवतेच्या तत्वांच्या आधारावर उभी राहिली आहेत.त्यामुळे इस्लामी जीवनशैली मानवजातीकरिता आजही लाभदायक ठरू शकते, हे मनावर ठसवणारी मांडणी. इस्लाम आणि इतर धर्मातील प्रार्थना, उपासनापद्धती तत्वे यातील साम्य लक्षात आणून देणारे सहज, ओघाव्या शैलीतील विवेचन. 'उपासनानंद', 'आर्थिकानंद', 'सामाजीकानंद', 'उत्सवानंद', अशा चार विभागांतून इस्लामी जीवनाच्या धार्मिक, सामाजिक, आर्थिक अशा विविध बाजूंना स्पर्श करणारे लेखन.
-
Lopalelya Suvarnamudra : Harvat Chalalelya Mhani (
ज्येष्ठ साहित्यिक द. ता. भोसले यांनी या पुस्तकात साडेपाचशे म्हणींची ओळख करून दिली आहे. यातील अनेक म्हणी आज वापरात नाहीत. भोसले यांनी त्या म्हणींचा अर्थ थोडक्यात समजावून सांगितला आहे. भाषेचा अभ्यास आणि त्यातील मौज अनुभवता येईल अशा या म्हणी आहेत. राज्याच्या ग्रामीण भागात वेगवेगळ्या म्हणी वापरल्या जातात, त्यादेखील इथं वाचायला मिळतात. या म्हणींमधून ग्रामीण भागातील लोकजीवनदेखील समजून येतं. एखाद्या म्हणीच्या माध्यमातून खूप मोठा आशय व्यक्त करता येतो. या पुस्तकातील म्हणी अशाच महत्त्वाच्या आहेत.
-
Shree-Shillak : Nivruttipurva Ani Nivruttipashchat
चाळीशीचा उंबरठा ओलांडलेल्या सर्वांसाठीच उपयुक्त पुस्तक. - चाळीशीतल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या निभावता निभावता उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ घालून पुरेशी 'शिल्लक' कशी ठेवायची आणि ती योग्य पद्धतीने कशी गुंतवायची याचे मर्गदर्शन. - खर्च नियोजन, उत्पन्न आणि आवक व्यवस्थापन आणि धोरणी गुंतवणूक या तीनही विषयांचा मागोवा घेणारे पुस्तक. - अनाठायी जोखीम न स्वीकारता डोळस गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध संकल्पनांची माहिती. - पतमापन म्हणजे काय, ठेवी का कर्जरोखे, त्यातल्या त्यात गृहवित्त कंपन्यात ठेवी ठेवतानाचे लाभ काय, महागाईवरचा उपाय म्हणून शेअर्स कडे कसे बघावे, ते करताना काय काळजी घ्यावी अशा अनेक विषयांना स्पर्श. - निवृत्तीनंतरही आपले आर्थिक स्वातंत्र्य जपायचे असेल तर त्याची तयारी नेमकी कशी करावी हे सांगणारे पुस्तक.
-
Prasadachi Vani... Arthath Tuka Mhane (प्रसादाची व
तुकाराम महाराज स्वतःच्या कवितेचे स्पष्टीकरण करताना म्हणतात - 'प्रसादाची वाणी वदतो उत्तरे। नाही मतांतरे जोडियेली।।' तुकोबा ईश्वरी प्रसादाने वेदांचा भाषानिरपेक्ष अर्थ पाहू शकतात कारण संस्कृत भाषेतील वेद ज्या ईश्वराने ऋषींना दाखवला तोच ईश्वर आता तुकोबांना तोच अर्थ दाखवत आहे. फरक हा आहे कि पूर्वीच्या ऋषींनी तो त्यांच्या म्हणजे संस्कृत भाषेतून पाहिला तर तुकोबा तो आता आपल्या म्हणजे मराठी भाषेतून पाहत आहेत. संत बहिणाबाई तुकोबांच्या अभंगाला 'तुकाराम वेद' असे का म्हणतात हे आत्ता लक्षात यावे. तुकोबा हे मंत्रद्रष्टे ऋषी व त्यांचे अभंग म्हणजे तुकोबांची वाणी ही प्रसादाची वाणी आहे. प्रस्तुत संपादनात तुकोबांच्या 'प्रसादाच्या वाणी'तून निघालेले काही अभंग त्यांच्या अर्थासह वाचकांपुढे ठेवले आहेत. 'अग्रोवन' दैनिकातून 'अध्यात्म' या वाचकप्रिय सदरातून प्रसिद्ध झालेल्या अभंगातील निवडक अभंगांचा संग्रह.
-
Garja Maharashtra (गर्जा महाराष्ट्र)
"आपण महाराष्ट्रात का राहतो, देशाच्या इतिहासात महाराष्ट्राचे योगदान काय, आपल्याला महाराष्ट्राचा अभिमान का वाटला पाहिजे? ... या प्रश्नांची उत्तरे या ग्रंथातून उलगडतील. महाराष्ट्राच्या राजकीय, ऐतिहासिक, [...]
-
Manasmantrana (मानसमंत्रणा)
माणूस समाजप्रिय आहे. समुहात जगताना तो 'माणूस'मधून घडत असतो. बालपणापासून सुरु झालेल्या आयुष्यात 'पौडांगवस्था' हा महत्वाचा टप्पा असतो. या अवस्थेत अनेक भावनांचा कल्लोळ उठतो. शारीरिक बदल घडत असतात. मनात व[...]