-
Bharatacha Arthsankalp (भारताचा अर्थसंकल्प)
या पुस्तकात भारतीय अर्थसंकल्पाविषयीच्या ऐतिहासिक माहितीचा पट लेखकाने मांडला आहे. यात अर्थसंकल्पाबाबतच्या काही स्मृती व घटनाही नमूद केल्या आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या अर्थमंत्र्यांपासून ते सध्याच्या अर्थमंत्र्यांपर्यंत सर्व अर्थमंत्री आणि त्यांनी सादर केलेले अर्थसंकल्प यांची माहिती तक्त्याच्या रूपात आहे. अशी एकत्रित माहिती वाचकांना संदर्भासाठी उपयुक्त ठरावी.
-
Goshta Jharyachi
वळणावळणाने, अखंडपणे झुळूझुळू वाहणार्या झर्याची ही गोष्ट. वाहता वाहता, आपल्या वाटेवरच्या सर्वांच्या भल्यासाठी धडपडणार्या जीवनाची ही गोष्ट, या झर्याची गोष्ट म्हणजे एका आदर्श सहजीवनाची गोष्ट. आदर्श सहजीवन म्हणजे काय ? दोन व्यक्ती जीवन वर्षानुवर्षं एकत्र जगत असल्या म्हणजे ते सहजीवन आणि आदर्श म्हणजे दोन्ही व्यक्तींना आपापल्या आयुष्यात जे करायचं आहे ते आयुष्यभर आनंदानं करायला मिळणं आणि परस्परविश्वासानं, सहकार्यानं आपापली आयुष्य संपन्न करता येणं. हे मला मिळालं, त्याचीच हि गोष्ट...
-
Saudichya Antarangat
सौदी अरेबियामध्ये पाच-सात वर्षे रहिवास केल्यानंतर झालेल्या त्या देशाचे आकलन, त्यामधून वाचकाला एका वेगळ्या जीवनपद्धतीची ओळख जशी होते, तसेच लेखिकेच्या मनोवृत्तीत झालेले परिवर्तनही कळून येते. तिने ही शैली किती सहज आत्मसात केली आहे! ती त्या शैलीचे वर्णन करते, वानप्रस्थातील एकांतवास!
-
Sattariche Bol
डॉ. रामाणी यांची गणना जगातील सर्वोत्तम दहा न्यूरोस्पायनल सर्जनांध्ये होते. सतत आपल्या कामात निमग्न असूनही डॉक्टर निसर्ग, संगीत, साहित्य यांत मनापासून रुची घेतात. त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन[...]
-
Ek Purn Aapurna
"डोळ्यांतले अश्रू पुसत मी एकदा डॉक्टरांकडे तर एकदा चैतन्याकडे पाहात होते. अनेक डॉक्टरांनी तर्हेतर्हेने माझा मानसिक छळ केला होता, त्यामुळे माझ्यातले काहीतरी संपून गेले आहे, मरून गेले आहे याची मला जाणीव झाली. पण त्याचं क्षणी माझ्या मनात जे रुतलं आहे ते फारच अनमोल आणि महत्वाचं आहे. एक प्रचंड ईर्षा आणि प्रचंड उर्जा माझ्या हृदयात एकवटली होती. तिने मला प्रत्येक संकटाला सामोरे जायचे सामर्थ्य दिले होते. एका आईच्या आत्मशक्तीने सगळीच्या सगळी वैद्यकिय भाकिते खोटी ठरवली होती!"
-
Shala Aahe Shikshan Nahi
खेड्यांपर्यंत, आदिवासी पाड्यापर्यंत शाळेची इमारत पोचली. पण शिक्षण पोचलं का? शाळेच्या वर्गात पोरं बसली. शाळा भरली. पण पोरं शिकली का? शाळेत जाऊनही मुलं निरक्षर का? अनुदान असूनही आश्रमशाळेत लेकरं उपाशी का? अनागोंदी कारभार आणि आदिवासी भागातील प्राथमिक शिक्षणाच्यादुरवस्थेचा शोध घेणारी एका कार्यकर्त्याची शोधयात्रा... भर पावसाळ्यात गडचिरोली, चंद्रपूर, मेळघाट, नंदुरबार, यवतमाळ, नांदेडजिल्ह्यातील दोनशे गावांमध्ये जाऊन घेतलेला शिक्षणाचा हा शोध... शाळा आहे पण शिक्षण नाही ! हे कटू सत्य अधोरेखित करणारा...वाचकाला अस्वस्थ करत शैक्षणिक प्रश्नांविषयी जागा करणारा लेखजोखा...
-
Jagaychay Pratyek second
डॉ. यशवंत केवळे, चर्मकार समाजातला तरुण. बूटपॉलिश करत, रेल्वेत तर्हर्हेच्या वस्तू विकत आणि नाना नोकर्या पत्करत त्यानं शिक्षण पूर्ण केलं. तो तेवढ्यावरच थांबला नाही, त्यानं अनेक कला, छंद जोपासले. रसिकतेनं जगला. आपल्या परिसराला सभ्यता शिकवण्याचा प्रयत्न केला.. आणि एका छोट्या अपघाताचं निमित्त होऊन मरण पावला. त्याच्या पत्नीनं कथन केलेली त्यांच्या सहजीवनाची ही कहाणी.
-
Taath Kanaa (ताठ कणा)
जगातील दहा न्यूरोस्पायनल सर्जनची नावे घेतली तर त्यामध्ये डॉ. पी. एस. रामाणी यांचा समावेश होतो. असे मोठे कर्तृत्व गेल्या तीस वर्षांत त्यांनी बजावले आहे. पाठीच्या कण्यावरील शस्त्रक्रियांच्या संदर्भात त्यांनी जी नवी तंत्रे संशोधिली त्यामुळे तर त्यांचे नाव या क्षेत्रात अजरामर झाले आहे.