Pannashicha Bhojya (पन्नाशीचा भोज्या)
-
Pannashicha Bhojya (पन्नाशीचा भोज्या)
|
|
Price:
300
|
Front Cover
|
Back Cover
|
|
माणसाच्या आयुष्यात पन्नासावं वर्ष हे स्थिरावण्याचं वर्ष आहे. लेखक रवी अभ्यंकर यांनी या वर्षात मागे वळून स्मरणरंजन केलं आहे. हे स्मरण वैयक्तिक असलं, तरी त्यात आसपासच्या समाजाचं प्रतिबिंब पडलेलं दिसून येतं. या शालेय आठवणी आहेत, आजूबाजूला घडलेल्या घटनांवर भाष्य आहे.
'नावाचा जुगार, शाळेसाठी वशिला,' 'ध्येय, तत्व, व्यवहार आणि सोय,' 'वास्तुशांतीचा नारळ,' 'ऐश्वर्या सुश्मिता युक्ता लारा चोप्राप्रिया,' 'घर घर की कहाणी,' 'एकटा जीव,' 'पहिली कमाई' अशा लेखांतून अभ्यंकर हलक्याफुलक्या, नर्म विनोदी शैलीने आठवणींचा खजिना समोर ठेवतात. आठवणी सांगताना त्यांनी विविध विषयांवर भाष्यही केले आहे.