Plasi Panipat Ani Baksar (प्लासी, पानिपत आणि बक्सर)
-
Plasi Panipat Ani Baksar (प्लासी, पानिपत आणि बक्सर
|
|
Price:
600
|
Front Cover
|
Back Cover
|
|
१७५७ साली झालेली प्लासीची लढाई ही बऱ्याच इतिहासकारांच्या मते लष्करी दृष्ट्या केवळ चकमक म्हणावी या दर्जाची होती. इंग्रज आणि सिराज उद्दौला यांच्यामध्ये झालेली ही लढाई ही खरे म्हणजे पीडलेल्या मुघल अधिकाऱ्यांनी आणि अन्यायग्रस्त हिन्दू व्यापाऱ्यांनी इंग्रजांच्या मदतीने सिराज उद्दौलाच्या क्रूर आणि मनमानी राजवटीविरुद्ध केलेले बंड होते. १७६१ साली पानिपत येथे अहमद शहा अब्दाली विरुद्ध महायुद्धासमान झालेल्या लढाईत मराठ्यांचा मोठा पराभव झाला, पण या पराभवामुळे हिन्दुस्थानच्या राजकारणात झालेली मराठ्यांची पिछेहाट जेमतेम दहा वर्षे टिकली, तरीही पानिपतच्या पराभवाची सल ही मराठी अंत:करणातून काही जात नाही.पनिपतचे युद्ध ही मराठी माणसाच्या शौर्याची, त्याच्या अस्मितेची, त्याच्या पराक्रमाची, त्यांच्या पराकाष्ठेच्या परिश्रमांची तशीच त्यांच्यातल्या आपसातल्या हेव्यादाव्यांची, त्यांच्यातल्या भाऊबंदकीची, त्यांच्यातल्या मुत्सद्दीपणाच्या अभावाची आणि शेवटी त्यांच्या हौतात्म्याची कथा आहे. १७६४ साली बक्सर येथे इंग्रजांविरुद्ध बंगालचा पदच्युत नवाब मिर कासीम, अवधचा नवाब शुजा उद्दौला आणि मुघल बादशहा शहा आलम २ यांनी एकत्र दिलेल्या लढाईचे नावही जरी अनेकांनी ऐकले नसले तरी या मध्यम श्रेणीच्या लढाईतील विजयामुळे इंग्रजांना मुघल बादशहाकडून बंगाल सुभ्याचा महसूल वसूल करण्याचे अधिकार कायमचे प्राप्त झाले व त्यामुळे इंग्रजी सत्तेचे पाय हिन्दुस्थानात भक्कमपणे रोवले गेले. एका वेगळ्या दृष्टीकोनातून हिन्दूस्थानातल्या या तीन भिन्न श्रेणींच्या लढ्याचे केलेले वर्णन आणि विवेचन रसिक वाचकांच्या मनाचा वेध घेईल यात शंका नाही.