-
Elonvarcha Sangharsh (इलोनवरचा संघर्ष)
सीनीचा मृत्यू झाला आणि सगळं काही बदलून गेलं. कित्येक वर्ष टिकून राहिलेल्या शांततेचा भंग झाला! काही शेकडो वर्ष इलोन या ग्रहावर स्त्री आणि पुरुष आपापल्या सीमारेषा आखून वेगवेगळे राहत होते. पृथ्वीवरचे एकेकाळचे एकमेकांचे साथीदार आता परस्परांचे विरोधक झाले होते. त्यांनी आपापल्या भागात शहरं वसवली होती, अमरत्व प्राप्त केलं होतं आणि मीलनाशिवाय संतती निर्मिती करायचं तंत्रज्ञानही अवगत केलं होतं स्वतंत्रपणे ! पण सीनीच्या मृत्यूनंतर, स्त्री आणि पुरुष पुन्हा युद्धाची – निर्णायक संघर्षाची भाषा बोलू लागले. इतकी वर्षं त्यांच्यात जी शांतता प्रस्थापित झाल्यासारखी वाटत होती, ती खोटी, आभासी तर नव्हती, की तो एक दीर्घ विराम होता? हा संघर्ष किती काळ चालणार होता? या संघर्षाचे परिणाम महाभयानक होते. दोन्ही बाजू संघर्षाच्या टोकावर पोचल्या होत्या. पण प्रत्यक्ष संघर्ष झाला का? विनाश टळला का? फँटसीच्या साहाय्याने विचारही करता येणार नाही अशी सामाजिक रचना उभारून स्त्री-पुरुष संबंधांवर, त्यांच्या सहजीवनावर भाष्य करणारी ‘कल्पित’ कादंबरी इलोनवरचा संघर्ष !
-
Bhartiya Itihasatil Avismaraniya Yoddhayanchya Shoryagatha (भारतीय इतिहासातील अविस्मरणीय योद्ध्यांच्या शौर्यगाथा)
भारतातले पंधरा शूर स्त्री-पुरुष ज्यांनी आक्रमणकर्त्यांपुढे कधीही शरणागती पत्करली नाही. पण इतिहास त्यांना विसरला आणि हरवून बसला. या कथा आहेत, आपल्या अधिकाराचं, श्रद्धेचं आणि स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी लढलेल्या निडर योद्ध्यांच्या ! काश्मीरचा ललितादित्य मुक्तपीड • आसामचा लचित बारफुकान राजाराज चोल आणि राजेंद्र चोल • कान्होजी आंग्रे गुजरातची राणी नायकी देवी • बंदासिंह बहादूर वारंगलची राणी रुद्रमा देवी त्रावणकोरचे मार्तंड वर्मा मेवाडचा महाराणा कुंभा • इंदोरच्या देवी अहल्याबाई होळकर• उल्लालची राणी अब्बाक्का चौटा • मणिपूरचे राजर्षी भाग्यचंद्र जयसिंग• अहमदनगरची चांद बीबी . शिवगंगा इथली वेलू नचियार. अवधची बेगम हजरत महल
-
Early Indians (अर्ली इंडियन्स)
अर्ली इंडियन्स आपले पूर्वज कोण होते आणि आपण कुठून आलो हे सांगणारी गोष्ट लेखक - टोनी जोसेफ अनुवाद - शुभांगना अत्रे व इंद्रायणी चव्हाण पुस्तकाविषयी शारीरिक दृष्टीने बुद्धिमान मानवांचं या ग्रहावरील आगमन, या प्रश्नावर दिवसेंदिवस गरमागरम चर्चा होत असतानाच टोनी जोसेफ यांनी प्रशंसनीय रितीनं त्याचं निराकरण केलं आहे. मानवी अवशेषांच्या आधारे प्राचीन डीएनएच्या अभ्यासामध्ये नव्यानंच झालेल्या संशोधनाचा खोलवर विचार करून त्यांनी ‘आर्यांचं स्थलांतर’ हा विषय मुळातून स्पष्ट केला आहे. लगेच निष्कर्ष काढता येईल, असा हा विषय नाही. त्याची गुंतागुंत वाढत जाणारी आहे. या विषयावरील आपल्या विचारांना पुष्टी देण्यासाठी जोसेफनी पुरातत्त्वशास्त्र, भाषाशास्त्र, अनुवंशशास्त्र आणि साहित्यातील विविधांगी माहिती क्रमबद्ध रितीनं दिली आहे.
-
Motya Chuka Kara,Mote Yash Milva (मोठया चुका करा,म
या पुस्तकात दीर्घकालीन यश संपादन करण्यासाठी कोणत्या सवयी लावून घेणं आवश्यक आहे इथपासून अर्थ व्यवस्थापनाचा पाया कसा घालावा - इथपर्यंत आणि अपयशाला आपलं मानून त्याचा स्वीकार करण्यापासून अनुकंपा म्हणजे नक्की काय इथपर्यंत अनेकांगी विचार लेखक व्यक्त करतात. हे पुस्तक तुमचं आयुष्य बदलून टाकणारं नाही, तर तुमची जाणीव वाढवणारं आहे. ज्यामुळं तुम्ही तुमच्या आयुष्यातले निर्णय अजाणतेपणानं नाही तर जाणीवपूर्वक घेऊ शकाल.