-
Artificial Intelligence (आर्टिफिशियल इंटेलिजन्स)
कृत्रिम बुद्धिमत्ता हा मानवी बुद्धिमत्तेने निर्माण केलेला चमत्कार आहे ! या तंत्रज्ञानामुळे अनेक अद्भुत गोष्टी साध्य होऊ शकतात !! या तंत्रज्ञानाच्या विकासाचा वेग विलक्षण आहे. येत्या काळात ते आपल्याही कळत-नकळत आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनणार आहे. जगामध्ये एआय वापरणाऱ्यांची टक्केवारी पाहता एआयचा सर्वात जास्त उपयोग भारतीयच करत असल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर, सर्वांनाच आर्टिफिशियल इंटेलिजन्सविषयी कुतूहल आहे. त्यासाठीच हे पुस्तक लिहिलं गेलं आहे. • 'एआय'बद्दल असणाऱ्या शंका आणि त्यांचं निरसन • अल्गोरिदम म्हणजे काय आणि तो कसा काम करतो • संगणकाला प्रशिक्षण कसं दिलं जातं • कृत्रिम बुद्धिमत्तेची कार्यपद्धती • जनरेटिव्ह 'एआय'ची वैशिष्ट्ये • 'एआय' टूल्स आणि त्यांचे उपयोग • यंत्रमानवाचा सहभाग • कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे समोर उभी राहिलेली आव्हाने • डीपफेक (फसवा) व्हिडिओ ओळखण्याच्या पद्धती • नोकरी-व्यवसायावर 'एआय'चे परिणाम • 'एआय'चे फायदे-तोटे • भारतात 'एआय'चा विस्तार
-
Coronanatarche Udyogvishwa (कोरोनानंतरचे उद्योगविश
डॉ. गिरीश वालावलकर यांनी लिहिलेले `कोरोना नंतरचे उद्योग विश्व ` हे पुस्तक येत्या काळात आवश्यक असलेल्या उद्योजकीय मानसिकतेचा, कष्टाचा, जिद्दीचा आणि संधींचा संदर्भग्रंथ आहे. त्याच बरोबर उद्योजक बनण्याची प्रेरणा नवोदितांना यामधून नक्कीच मिळेल. गोष्टीरूप उद्योग कथा नेहमीच जास्त परिणामकारक होतात हेच नेमके ह्या पुस्तकाने साधले आहे. उद्योग यशस्वी होण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्याचा धांडोळा हे लिखाण अप्रत्यक्षपणे घेते. भांडवल, ग्राहकसेवा, वस्तू किंवा सेवेचा दर्जा, जाहिरात तंत्र, वितरणाचे आयोजन अशा उद्योगावश्यक गोष्टी अनेक संदर्भातून समोर येतात. कोरोनानंतरचे जग नोकरी मागणाऱ्याऐवजी नोकरी देणाऱ्यांचे असेल यावर भर देणारे हे लेखन आहे.
-
Ladder Varchya Sanvedana (लॅडर वरच्या संवेदना )
प्रत्येक मराठी माणसाने वाचलीच पाहिजे अशी ही कादंबरी, आपल्या कोशातून बाहेर पडून जीवनात यशस्वी होण्याची प्रेरणा देऊ शकते तसंच स्वतःच्या आयुष्याकडे पाहण्याचा एक नवा प्रगल्भ दृष्टिकोनसुद्धा देऊ शकते. - श्री.राज ठाकरे, म.न.से.अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार ‘Ladder'warchya Sanvedana... reflects a mood of the new class in the corporate sector, with it’s complacency, self indulgence and loneliness too. - पद्मश्री कुमार केतकर, राज्यसभा सदस्य आणि ज्येष्ठ पत्रकार वाचकाला अंतर्मुख व्हायला भाग पाडणारी ही कादंबरी म्हणजे एका चांगल्या कलाकृतीचं लक्षण आहे . ही कादंबरी वाचकांच्या संवेदनांना-अनुभवांना जागृती निर्माण करते. -डॉ. उदय निरगुडकर, समूह संपादक, न्यूज18 लोकमत अत्यंत वाचनीय अशी कादंबरी. नेमकेपणा, ठाशिव व्यक्तिरेखा आणि ओघवती भाषा हे या कादंबरीचे सर्वात महत्त्वाचे गुणविशेष. - श्री. विजय केंकरे, प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक ‘प्रत्येक सामान्य व्यक्तीमध्ये असामान्य व्यक्तिमत्त्व दडलेलं असतं’ हे ज्यांना उमगतं तेच असामान्य असतात, हे सांगणारं कथानक. - डॉ. विठ्ठल कामत, प्रसिद्ध व्यावसायिक व लेखक