-
Changej Khan Aani Adhunik Jagachi Nirmiti (चंगेज खान आणि आधुनिक जगाची निर्मिती)
रोमन लोकांनी चारशे वर्षांत जितकी भूमी पादाक्रांत करून जितक्या लोकांना अंकित केले त्यापेक्षा अधिक भूमी नि लोक चंगेज खान ह्याच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या सैन्याने पंचेचाळीस वर्षांत जिंकून घेतले. जिंकलेल्या प्रत्येक देशात मंगोल लोकांनी सांस्कृतिक अभिसरण व व्यापार वाढवला. त्यातून संस्कृतीला बहर आला. आशिया आणि युरोपातील बहुसंख्य राजांच्या तुलनेत प्रागतिक असणाऱ्या चंगेज खान ह्याने जनतेची छळवणूक थांबवली, सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य दिले आणि सरंजामशाही रद्द करून परंपरागत विशेषाधिकारांना मूठमाती दिली. एका भटक्या जमातीपासून सांस्कृतिक कल्लोळ निर्माण करणाऱ्या मंगोल साम्राज्यापर्यंतच्या आधुनिक जगाची निर्मिती कशी झाली ह्या प्रवासाची ही गाथा! “अमंगल प्रारंभापासून इतक्या उंचीवर पोहोचणारे येशू ख्रिस्ताचा अपवाद वगळता अन्य कुणी असू शकेल, असे वाटत नाही!” – हार्पर्स “वेदरफोर्ड ह्यांच्या जिवंत विश्लेषणामुळे मंगोल संस्कृतीचा लौकिक पुनःस्थापित झालेला आहे. अत्यंत बुद्धिमत्तापूर्ण वळसे घेत वाचकांना तपशील वैविध्याची भेट देणारे अत्यंत कसबी लेखन !” – कीर्कस रिव्ह्यूस “वेदरफोर्ड हे विलक्षण कथाकथनकार आहेत. त्यांनी रेखाटलेले चंगेज खान ह्याचे व्यक्तिमत्त्व हे सखोल परिश्रमातून आणि गुंतागुंतीच्या तपशिलांतून निर्माण झाले आहे. वेदरफोर्ड ह्यांचे लेखन म्हणजे मंगोल साम्राज्यनिर्मात्याच्या गुणावगुणांचे उदारतेने घडवलेले दर्शन !” – मिनियापोलीस स्टार ट्रिब्यून
-
Tine Gilile Suryashi (तिने गिळिले सूर्याशी)
लक्ष्मी मुडेश्वर-पुरी लिखित ‘तिने गिळिले सूर्याशी’ ही कादंबरी म्हणजे प्रीती, शौर्य आणि भारतीय स्वातंत्र्यलढा यांचा तीन पिढ्यांतील स्त्रियांच्या विशेषतः धाडसी व संस्मरणीय तरुण नायिका मालतीच्या नजरेतून घेतलेला अद्भुत शोध आहे. ही कादंबरी आधुनिक भारतीय इतिहासाच्या कोलाहलपूर्ण काळातील उत्साहवर्धक आणि निराशाजनक स्पंदनांचा वेध घेते. निर्भयता आणि अटळ निर्धार या गुणांच्या जोरावर मालती तत्कालीन समाजात प्रचलित असलेल्या, स्त्रियांना जखडून ठेवणाऱ्या, पितृसत्ताक चालीरीतींना झुगारून तिला दडपून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना प्रखर विरोध करते उत्कृष्टपणे सांगितलेली, कल्पनारम्य व लक्षवेधी असणारी ‘तिने गिळिले सूर्याशी’ ही कादंबरी अस्सल व रोमांचक आहे. खेरीज मागील काही वर्षात पदार्पणातच अत्यंत संस्मरणीय ठरलेल्या कादंबऱ्यापैकी ती एक आहे.
-
Goat Days (गोट डेज)
आखाती देशांत जायचे, भरपूर पैसे कमवायचे आणि मायदेशातल्या कुटुंबियांना सुखात ठेवायचे या आकांक्षेने तिथे जाणाऱ्या लाखो लोकांपैकी एक म्हणजे केरळात मजुरी करणारा नजीब. त्याची आखाती आकांक्षा सफल झाली की स्वप्नरूपातच राहिली ? त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागला. कधी निसर्गाने तर कधी मानवाने, प्राणच पणाला लावले. त्यातूनही तो निभावून गेला, कसा? कोणत्या श्रद्धांमुळे? जसा होता तसा राहिला की ? मानवी आयुष्याची संभवनीय परिवर्तने आणि मूलभूत मूल्ये, यांचे चित्तवेधक दर्शन या कादंबरीत घडते. ‘गोट डेज’ मल्ल्याळी भाषेत प्रकाशित झाली आणि अल्पावधीत बेस्ट सेलर या वर्गात मोडली जाऊ लागली. मल्ल्याळी साहित्यातील एक अत्यंत तेजस्वी असे व्यक्तिमत्व म्हणजे बेन्यामिन. त्यांची उपरोधीक आणि प्रसंगी हळुवार होणारी शैली नजीबच्या आयुष्याची वाळवंटी वंचना, बघता बघता, एकाकीपणा आणि परकेपणा, यांचे वैश्विक परिणाम कसे बनते ते समर्थ रीतीने उभे करते. या पुस्तकाच्या मल्याळम आवृत्तीच्या तीन लाखाहुन अधिक प्रतींची विक्री झालेली आहे.
-
Maurya Chandragupta Te Samrat Ashok Parshwabhumi G
चंद्रगुप्त ते सम्राट अशोक पार्श्वभूमी, गाथा आणि वार इ.स.पूर्व ३२४ ते इ.स.पूर्व १८५ या काळात मौर्यांनी संपूर्ण भारतीय उपखंडावर कार्यक्षमतेने आणि राज्यववस्थापनातील कौशल्याने राज्य केले. ख्रिस्त-पूर्व सहाव्या शतकातील मगध साम्राज्याच्या उद्यापासून सुरुवात करून हे स्पष्ट विवेचक पुस्तक मौर्यांच्या काळातील नाट्य, मौर्यांच्या राजकारणातील कुटिलता, आणि गुंतागुंत चित्रित करते. मौर्य साम्राज्याचा पहिला, गूढ राहिलेला राजा चंद्रगुप्त याच्यापासून सुरुवात होते आणि चंद्रगुप्त याच्यापेक्षा अधिक गूढ म्हणून राहिलेला, चंद्रगुप्त याचा मार्गदर्शक / गुरू चाणक्य / कौटिल्य याचा वेध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात आहे. चंद्रगुप्त याचा मुलगा आणि वारस बिंदुसार हा मौर्य.