-
Ye Hai Mumbai Meri Jaan (ये है मुंबई मेरी जान)
सरदार कुलवंतसिंग कोहली.मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अन् राजकीय क्षेत्रांतमोलाचं योगदान दिलेलं हे व्यक्तिमत्त्व.योगायोगानं मुंबईच्या मोहक मयसभेशी - चित्रपटसृष्टीशीकुलवंतजींचा घनिष्ठ संबंध आला. कपूर कुटुंब, दिलीपकुमार - राजेंद्रकुमार - धर्मेंद्रपासून राजकुमार - संजीवकुमार - जितेंद्रपर्यंतचे नायक,मीनाकुमारी - मधुबालापासून माला सिन्हापर्यंतच्या नायिका,व्ही. शांताराम - असीफ - मेहबूबसारखे दिग्दर्शक,नौशादपासून रवीपर्यंतचे संगीतकार, प्राणसारखे दिलेर खलनायक -किती किती नावं सांगायची?अशा दिग्गज कलाकारांबरोबर कुलवंतजींच्या तारा जुळल्या.सामान्य माणसासाठी आकाशीची नक्षत्रं असणारेहे चित्रपटसृष्टीतील तारे-तारका कुलवंतजींनाहाडामांसाची माणसं म्हणून न्याहाळता आली. अटलबिहारी वाजपेयी - बाळासाहेब ठाकरे -सुशीलकुमार शिंदे किंवा प्रमोद महाजन -झैलसिंग - बुटासिंग यांच्यासारखेराजकारणीदेखील या चित्राची चौकट बनून भेटतात. ही सारी माणसं अन्त्यांच्याबरोबर जगलेला अवघा काळकुलवंतसिंग यांनी आपल्यापुढे जिवंत केला आहे|