-
Rajyache Vaibhav Birbal Ani Itar Katha (राज्याचे वैभव बिरबल आणि इतर कथा)
भारतीय चातुर्यकथा म्हटलं की बिरबल आणि तेनालीराम हीच नावं झटदिशी डोळ्यांपुढे येतात. या दोन्ही अत्यंत हुशार व्यक्ती इतिहासात अजरामर होऊन बसलेल्या आहेत. त्यातही बिरबलाच्या कथा तर अजूनही संदर्भासाठी वापरल्या जातात. अगदी इंटरनेटवर, मॅनेजमेंटच्या धड्यांमध्ये बिरबलाचं स्थान अव्वल असल्याचं दिसतं. अकबर बादशाह आणि बिरबल यांचं मेतकूट फारच खुमासदार जमलेलं आहे. अकबराच्या दरबारातल्या नऊ रत्नांपैकी बिरबल अकबराचा विशेष लाडका होता. बिरबलानं आपलं बुद्धिचातुर्य, हजरजबाबीपणा, सच्चेपणा, निर्भयता, शौर्य वगैरे गुणांच्या जोरावर बादशाहचं मन तर जिंकून घेतलं होतंच; पण देशविदेशांतही त्याची कीर्ती पसरलेली होती. बिरबल-बादशाहच्या कथा वाचताना करमणूक तर होतेच, पण बोधही मिळतो. शहाणपण मिळतं. शिकायला मिळतं. आपल्या देशात इतकं मौल्यवान रत्न जन्माला आलं, याचा अभिमानही वाटतो. या गोष्टी केवळ मुलांनाच नाही, तर सर्व वयोगटांच्या, लहान-थोर माणसांना अनेक प्रकारे आनंद देतील अशाच आहेत.
-
Shantidoot ( शांतिदूत)
शांती ही विलक्षण गोष्ट आहे आणि स्वातंत्र्य अत्यंत पवित्र. 'कार्डिनल्स' आणि 'नीलपंखी' जे पक्षी आपापसात लढाया करतायत. संभ्रमात पडल्यामुळे नीलपंखी जे पक्ष्याला डगमगायला झालं. त्याला आपली तलवार लहानग्या कार्डिनलच्या मानेवर उतरवताच आली नाही. कार्डिनलने आपले डोळे मिटले आणि तलवारीच्या वाराची वाट पहात त्याने मान आक्रसून घेतली... नॅन्सी यी फान सहावीत असताना क्रांतियुद्धं, दहशतवाद आणि 9/11 च्या घटनेचा अभ्यास करत होती. त्याच रात्री तिला लढाई करत असलेल्या पक्ष्यांबद्दलचं धडकी भरवणारं स्वप्न पडलं. दुस-याच दिवशी तिने विश्वशांतीचा संदेश देण्याकरता कादंबरी लिहायला सुरुवात केली. अवघ्या बारा वर्षांच्या या अत्यंत बुद्धिमान बाललेखिकेने मैत्री आणि साहस या गुणांच्या जोरावर जुलमावर कशी मात करता येऊ शकते, ते या सशक्त कादंबरीतून दाखवून दिलेलं आहे.