-
Tisra Shwas (तिसरा श्वास)
हिंदी कादंबरीकार कामतानाथ यांच्या कथा जीवनानुभवावर बेतलेल्या आहेत. त्या सामाजिक असमानतेच्या प्रश्नांशी दोन हात करतात. ते स्त्री, दलित, शेतकरी, शेतमजुर, अल्पसंख्या या सगळ्यांचे प्रश्न ऐरणीवर घेतात. पात्रांची एवढी विविधता एखादा कथाकाराच्या कथेमध्ये क्वचितच आढळते. स्वातंत्र्योत्तर भारतीय समाजाची स्वप्ने, संघर्ष, मोहभाग, संशय, संकल्प आणि परिवर्तनन यांचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात पडलेले आपणास दिसते.