-
Hey Ram Gandhi Hatyakandacha Pramanik Dhandola (हे
गांधीहत्येचे सत्य केवळ इतकेच नव्हे की, ३० जानेवारी १९४८ दिनी संध्याकाळी गोडसेने बिर्ला भवनात येऊन गांधींवर तीन गोळ्या झाडल्या. किंबहुना, गांधीहत्येला पूर्णपणे समजून घेण्यासाठी, त्याच्या पार्श्वभूमीचा वस्तुस्थितीदर्शक अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. या पुस्तकात गांधीहत्येशी संबंधित संपूर्ण कालखंडाचा तपशीलवार अभ्यास करण्यात आला आहे. स्वातंत्र्य चळवळीचा शेवटचा टप्पा, मुस्लिम लीगकडून पाकिस्तानची मागणी, जातीय दंगली, देशाची विनाशकारी फाळणी, लुटलेल्या निर्वासितांची समस्या, मुस्लिम तुष्टीकरणाचा अतिरेक, पाकिस्तानला पंचावन्न कोटी रुपये देण्याचा गांधींचा हट्ट, बहुसंख्या हिंदूंच्या मनात निर्माण झालेली उपेक्षेची भावना आणि क्षोभ! सत्ता आणि सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी काँग्रेसच्या तत्कालीन नेतृत्वात पडलेली फूट ... अशा अनेक कारणांनी गांधीहत्येची पार्श्वभूमी आधीच तयार झाली होती. गोडसेने झाडलेल्या तीन गोळ्यांप्रमाणे हे सर्व मुद्दे सुद्धा गांधीहत्येला तितकेच जबाबदार आहेत. पण दुर्दैवाने गांधी हत्येची चर्चा होते तेव्हा या मुद्द्यांवर मौन पाळले जाते. ‘माझ्या मृतदेहावर पाकिस्तान बनेल’ असे म्हणणाऱ्या गांधींनी आमरण उपोषण का केले नाही, फाळणीविरुद्ध कोणतेही आंदोलन का केले नाही, या मुद्द्यावर कधीच गंभीर चर्चा होत नाही? कटाच्या तळापर्यंत जाण्यासाठी सदर पुस्तकाच्या लेखकाने हजारो पानांचा पोलीस तपास अहवाल, केस डायरी, साक्षीदारांचे जबाब आणि संपूर्ण न्यायालयीन कामकाजाचा बारकाईने अभ्यास केला आहे. एकंदरीत, प्रमाणित इतिहासलेखनाच्या दृष्टिकोनातून या पुस्तकाकडे पाहिले तर लेखक प्रखर श्रीवास्तव यांनी प्राथमिक स्रोतांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक, सावधगिरीने आणि समंजसपणाने केल्याचे जाणवते.