-
Ekla Chalo Re (एकला चलो रे)
ही कथा एका निराशेच्या कड्यावर पोहोचलेल्या, दु:खाची, वेदनेची, कौटुंबिक वाताहत झालेल्या व्यक्तीच्या जगण्याच्या संघर्षाची आहे. वाचताना मन कुंठित होते. व्याकूळ होते. परंतु संजीव सबनीस यांची विजीगीषा अशा उत्तुंग श्रेणीची आहे की त्यांना दया, करुणा, अनुकंपा यांची मातब्बरी वाटत नाही. त्यांचा दुर्दम्य आत्मविश्वास व पराकोटीची सकारात्मकता यामुळे त्यांना भोवतालच्या जगाकडून अनुकंपेची गरज वाटत नाही. अपंगावस्थेतील हॉस्पिटल, घऱ, विकलांग आश्रम यांतील दैनंदिन दिनक्रमाचे, तेथे वेळोवेळी भेटलेल्या डॉक्टरांपासून साहाय्यकांपर्यंतचे त्यांचे अनुभव वाचताना अंगावर काटा येतो.