-
Phutkya Madakyatale Pani (फुटक्या मडक्यातलं पाणी)
हे पुस्तक आहे आठवणींचं. हे पुस्तक आहे- तळमळीचं- आपलं काहीतरी मोलाचं हरपलं आहे, अशा भावनेचं आणि सरतेशेवटी सगळ्या गोंधळातून बाहेर पडत स्वत:ला शोधण्याचंही; कारण मानसिक-भावनिक गोंधळ हा तर जातीयतावादी समाजाचा भागच असतो. दलित म्हणून भारतातील जातीयतावादी समाजात जन्मल्यावर कोणकोणत्या प्रकारच्या अनुभवांना सामोरं जावं लागतं, समाज दलितांना कसं अदृश्यच करून टाकतो, त्यांना आपल्या आठवणींत, आपल्या कहाण्यांत स्थान कसं नाकारतो, हे एका नव्या पिढीच्या मनस्वी तरुणानं लिहिलेलं आत्मकथन सर्वांनीच वाचण्यासारखं आहे. जातिभेद माणसांना कसे अमानुष बनवतात त्याची आणि आपल्या सगळ्या समजुतींना मुळापासून हादरा बसवणारी गाथाच आहे ही.