-
Pashchim Aaghadivar Samsum (पश्चिम आघाडीवर सामसूम)
सत्यबोध हुदलीकर याने मूळ जर्मन भाषेतून मराठीत आणलेलीही कांदबरी 1932 साली प्रकाशित झाली. युद्धाची विफलता पटवणे हाच या कादंबरीचा हेतू आहे. या कांदबरीवरील चित्रपट कमालीचे लोकप्रिय झाले. 1930 पासूनच युद्धविरोधी सूर जगात उमटू लागले आणि त्याचाच परिणाम म्हणून इंग्लडमध्ये बर्ट्रान्ड रसेल यांनी अण्वस्त्र विरोधी व युद्ध विरोधी चळवळ सुरु केली. या चळवळीचे ब्रीदवाक्य ‘पुन्हा युद्ध नाही’ असेच होते. त्या चळवळीचा ‘पहिला हुंकार’ म्हणजेच ही कांदबरी. ही कादंबरी प्रसिद्ध होऊन 90 वर्षे झाली आहेत तरीही या कादंबरीचे महत्त्व कणभरही कमी होत नाही.