-
Krudhyati Ek Thararak Mahasangram (कृध्यती एक थरारक महासंग्राम)
मानवतेच्या कल्याणासाठी महाभारतासमान विध्वंस पुन्हा होऊ नये, हे गरजेचे होते. याच उद्देशाने श्रीकृष्णाने दैवी अस्वे सुरक्षित ठेवण्याची सोय केली होती; परंतु सत्तेच्या लोभापायी मनुष्य कोणताही थर गाठू शकतो, हे कृष्णमृत्यूपश्चात सातशे वर्षातच समजले. कृथ्यति, हा दैवी शक्तीने भरलेला एक असा विक्षिप्त गुन्हेगार उठ्यास आला, ज्याचे लक्ष्य शत्रू राज्यातील गर्भाचा वध करणे, हे होते. हा योद्धा जर 'विद्यधुरंधर स्पर्धा जिंकून इंद्रपदी बसला, तर समग्र आर्यावर्ताचा सर्वनाश होणार हे निक्षित. या दैवी शक्तीने उन्मत्त विक्षिप्त गुन्हेगाराला छोट्याशा राज्याचा सेनापती वीरसेन रोखू शकेल का? डॉ. ऋषिकेश बोधे यांसारख्या लेखकांनी 'कृथ्यती'सारखी गहिराई असलेली साहित्यकृती साकारून मराठी फिक्शनला एक नवे परिमाण दिले आहे. या कादंबरीचे साहित्यिक मूल्य अत्यंत ठोस आहे. तिचं भाषिक सौंदर्य, मनाच्या गुंतागुंतीचा सुक्ष्म येध आणि अंतःप्रेरणेला भिडणारी तिची शैली यामुळे ही कादंबरी एक दीर्घकाळ आठवणीत राहील अशी ठरते. खरे सांगायचे तर, बऱ्याच काळानंतर एवढं शुद्ध, विचारप्रवृत्त आणि संवेदनशील साहित्य वाचायला मिळाल्याचा आनंद झाला. मराठी साहित्यात अनेक वर्षापासून अशा प्रकारच्या सशक्त कल्पनाविष्काराच्या अभावाची जाणीव होती; पण 'कृध्यती मुळे त्या पोकळीची भरपाई झाल्याचे समाधान वाटते. आगामी काळात ह्याचे पुढील भागही येवोत, अशा शुभेच्छा.