-
Narhari-Navya Yugacha Preshit (नरहरी-नव्या युगाचा
नरहरीनं अश्वत्थ वृक्षाचं एक रोपटं लावलेलं होतं. त्या रोपट्याला कुसुमनं पाणी घातलं. त्यावेळी नरहरीनं एक प्रार्थना म्हटली. "मानवते ! तू स्वतःला ओळख. या पृथ्वीचं स्वतःमध्ये रुपांतर कर. तुमच्या सद्भावनेच्या बळावर सर्व समस्यांची उकल व्हावी. या विश्वाच्या भव्य मंदिरामध्ये तुमच्या अंतःकरणातील पवित्र जाणिवेची ज्योत प्रखर तेजानं तळपू दे. सर्व शारीरिक आणि मानसिक जाणिवांचा उन्नयन होऊ दे. ही पवित्र जाणीव अंतःप्रेरणेद्वारे अतिमानस स्तरावर जाऊ दे. या उदात्त जाणीवेमधून वैश्विक कुटुंबाचा उदय होऊ दे ! ओम !"