-
Hurda (हुरडा)
ही जी घटना घडली तिला कोण जबाबदार? ज्यांनी कोवळ्या मुलींवर अत्याचार केला, बलात्कार व खून केला, ते ? की त्यांचे आई - वडील? ज्यांनी त्यांना वेळेत आवरले नाही, पाठीशी घातले ते? हा दोष कोणाचा? ज्या न्यायदेवतेकडून न्यायाच्या अपेक्षा असूनही न्याय मिळाला नाही ती? त्यांना न्यायालयाकडून न्याय मिळाला नाही म्हणून जनतेने कायदा हातात घेऊन जनतेच्या दरबारात त्यांनी न्याय दिला ते दोषी ? ते बरोबर की, हे याचा फैसला कोण करणार? याचा फैसला काळच करणार. कारण पुढील काळात असा गुन्हा करणारे दहा वेळा या घटनेचा विचार करतील. संपूर्ण महाराष्ट्रात ही घटना बातमीच्या रूपाने पसरली. लोकांना वाईट वाटले नाही. जनतेने शेवटी न्याय केला. जनतेच्या दरबारात जे काय होते ते नेहमी लोकांनी स्वीकारले आहे.