-
Vidyatai Ani (विद्याताई आणि)
महाराष्ट्रात महात्मा फुले आणि महर्षी कर्वे यांनी स्त्री-शिक्षणाची पायाभरणी केली. नंतरची पायरी होती स्त्रीयांचं आत्मभान जागृत करण्याची, समाजास स्त्रीप्रश्नांप्रती संवेदनशील बनवण्याची. हे कार्य हाती घेतलेल्यांमध्ये विद्या बाळ यांचं नाव अग्रस्थानी आहे. प्रथम 'स्त्री' आणि नंतर 'मिळून साऱ्याजणी'चं माध्यम वापरून विद्याताईंनी स्त्रियांमध्ये स्वत्वाची भावना चेतवली. संवाद हे विद्याताईंचं बलस्थान. न पटलेल्या रूढी- रिवाजांशा संघर्ष करणं – तो मात्र पटेल अशा शब्दांत ही त्यांची खास शैली. दृढ कृतीचा आग्रह, पण भाषा मात्र अनाग्रही आणि ॠजू. पुरुषप्रधानतेस विरोध दर्शवतानासुद्धा त्या पुरुषांशी संवाद साधण्यास प्रयत्नशील असतात. म्हणून तर स्त्रीमुक्ती चळवळीतील नेमस्त पंथाचं नेतृत्व आपसूक त्यांच्याकडे जातं. पूर्णवेळ गृहिणी ते पूर्णवेळ कार्यकर्ती हा विद्याताईंचा प्रवास म्हणजेच विद्याताई आणि..
-
Priya Mitra
आपल्या छोट्याश्या आयुष्याच्या परिघाताही अनेक घटना, प्रसंग घडत असतात. अनेक व्यक्ति भेटत असतात. आपण खुप काही पहात असतो, ऐकत असतो. मनात त्यामुळे काही तरंग उठतात. विचार चालु होतो. त्या त्या वेळी त्यामुळे आपला काही दृष्टिकोन बनत जातो. त्याच्याच ह्या काही कथा, गेल्या पंचवीस तीस वर्षात हौसेने मी लिहिलेल्या विविध नियात्कालिकातुं प्रसिध्हा झालेल्या कथांचा हां संग्रह- प्रिय मित्रा. कथा हा अगदी लवचिक साहित्यप्रकार आहे. कविता, नाटक, निंबंध, लघुनिंबंध ह्याकदेही तो वळतो पण काहीतरी एकात्म पारीणामाकडे संकेत करत असतो. त्याचा जीव अगदी पावलापुरता प्रकाश एवढाच असेल पण त्यानेही जीवऩानुभवाच्या वाटेवर दिलासा दिलेला असतो. अगदी प्रिय मित्रासारखा.