-
Katha Maruti Udyogachi
भारताने १९८० च्या दशकात तंत्रज्ञान व आधुनिकीकरणाची कास धरली. याच काळात म्हणजे १९८३ मध्ये भारताची पहिली अत्याधुनिक गाडी ‘मारुती’ रस्त्यावर धावू लागली. ‘मारुती उद्योग’ या सार्वजनिक उद्योगाची स्थापना झाली. जपानी कंपनीच्या सहकार्याने ‘मारुती’ने इतिहास घडविला. औद्योगिक क्रांतीबरोबरच अनेक वाहन उद्योग देशात उदयाला आले. ‘मारुती’चा हा सुवर्णप्रवास मारूती सुझुकी कंपनीचे चेअरमन आर. सी. भार्गव यांनी ‘कथा मारुती उद्योगाची’मधून कथन केला आहे. आणि मराठी अनुवाद महाराष्ट्र टाइम्सचे मुख्य उप संपादक जॉन कोलासो यांनी केला आहे. भारतीय उद्योगाच्या विकासाची वाटचाल यातून जाणून घेता येते.