-
sthanbhrshta (स्थानभ्रष्ट )
मुलांवर अतिविश्वास ठेवणाऱ्या माझ्यासारख्या भोळ्या (बावळट) वृद्धांना त्यांच्या जीवनाची अंतिम वर्षे दुःखात भिजून जाऊ नयेत, यासाठी सावध राहण्याचा मी सल्ला देतो. 'जे न देखे रवी ते देखे कवी' त्याच्यापुढे जाऊन म्हणावेसे वाटते, की 'जे न देखे कवी ते देखे अनुभवी!' म्हणून मला आलेल्या अनुभवांना शब्ददेह देऊन मी जिवंत उदाहरण समाजासमोर ठेवत आहे. हे कथन असले तरी ही कथा नाही. काही स्वजनांच्या बर्यावाईट कृत्यांची नोंद केल्याविना ते सादर होऊ शकत नाही, म्हणून त्यात तशा काही प्रतिक-प्रसंगाचे सविस्तर आलेखन आहे. ते केवळ वास्तवदर्शन घडवण्यासाठी आणि माझ्या सल्ल्यास वजन प्राप्त करून देण्याच्या हेतूने केले आहे. पुढच्यास ठेच मागचा शहाणा हे स्मरून मी भविष्यातील वृद्धांचे जीवनमान बिघडू नये, या हेतूने ही 'ठेच'; नव्हे, अनेक ठेचा सादर केल्या आहेत. आपल्या मुलांवरील प्रेमापोटी कमी-अधिक चुका प्रत्येकाकडून घडतात, पण या चुकांचा अतिरेक मुर्खपणा ठरतो. आपल्या मुलाची पत्नी वा मुलीचा नवरा यांच्या, आपल्याच मुलांना वश करण्याच्या क्षमतेस कमी लेखू नये. शक्य तो पायाखालची सरावाची जमीन सोडू नये.
-
Kathepathcha Samudra (काचेपाठचा समुद्र)
काऊन्सेलिंगची गरज हे विसाव्या शतकाच्या शेवटच्या दोन-तीन दशकांच अपत्य ! ती गरज असणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी 'जाऊ की नको,' ही अवस्था ओलांडण्यात वेळ वाया जातो. तरी बिचकत का होईना, आता लोक काऊन्सेलरकडे जातात. तसे माझ्याकडेही येत. या कादंबरीची नायिका माझ्याकडे आली नव्हती. पण... नायिकेची अस्वस्थ शेजारीण मला भेटायला आली. शेजारी राहणाऱ्या नवविवाहित दांपत्याबद्दल तिनं मला खूप काही सांगितलं. ती निंदा नव्हती. सामाजिक कर्तव्याचं भान असलेली ती शेजारणीला तीन-चार आठवड्यात पाहिलं नाही, वा तिचं बोलणं ऐकलं नाही,असं सांगून अस्वस्थ स्वरात म्हणाली, "नवरा तिला दटावत असल्याचं कानी येतं. तिचे दबले हुंदके ऐकू येतात, म्हणजे ती बाहेरगावी गेलेली नाही. एवढ्या माहितीच्या आधारे मीच त्या 'नायिके' कडे गेले आणि मग... लेखिकेसमोर एका भग्न आयुष्याचा मोठा पट उभा राहिला. लेखीकेमधील काऊन्सेलरने तो उध्वस्त झालेला संसार सावरला. त्याचीच ही कथा...