-
Katha Shivray (कथा शिवराय)
स्वराज्य निर्मिती अन् स्वधर्म रक्षण, कल्याणकारी योजना, शेती व व्यापार वृध्दी, सक्षम आरमार निर्मिती.. थोडक्यात शून्यातून विश्व निर्माण करणे म्हणजे शिवगाथा! कुशाग्र बुध्दी, चतुर युक्ती, कठोर शिस्त, अविश्रांत परिश्रम, सूत्रबद्ध नियोजन आणि शुद्ध चारित्र्य म्हणजे शिवगाथा ! इंग्रजीचा अट्टाहास नव्हे तर स्वभाषेचा अभिमान, पुतळे उभारणे नव्हे तर गडकिल्ल्यांचे संवर्धन म्हणजे शिवगाथा! चंगळवाद अन् बेशिस्त नव्हे तर कठोर शिस्त आणि पोकळ घोषणा नव्हे तर ध्येयाची उत्तुंग झेप म्हणजे शिवगाथा ! ही यशोगाथा साध्या सरळ आणि रंजक शैलीत कथन करण्याचा हेतू हा की ती छोट्या मोठ्यांना.. सर्वसामान्यांना समजावी, उमजावी! ही यशोगाथा सर्वांना कळावी, आकळावी, समजावी, उमजावी, तनमनात झिरपावी.. श्वासात भिनावी आणि कृतीत उतरावी ही प्रार्थना !