-
Lokmanya Te Mahatma (लोकमान्य ते महात्मा)
मान्यवरांचे काही अभिप्राय या ग्रंथाद्वारे डॉ. मोरे यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाचा आणि लोकव्यवहाराचा सर्वांगीण आंतरविद्याशाखीय वेध घेतला आहे. अनेक अभ्यासकांनी एकत्र येऊन करायचे कार्य त्यांनी एकटयाने पार पाडले, ही बाब खचितच गौरवास्पद आहे. - य. दि. फडके राजकीय इतिहासचित्रणाचा एक नवा आदर्श निर्माण करणाऱ्या या ग्रंथाचे महत्त्वाचे वैशिष्टय आहे ते पुराव्यांच्या बहुसंदर्भीय पध्दतीच्या मांडणीत! - दिलीप पुरुषोत्तम चित्रे भारतीय इतिहासातील एका तेजस्वी पण तणावग्रस्त कालखंडावर प्रकाशझोत टाकताना एक पूर्णपणे नवा 'पॅरेडाइम' देणारा हा महाग्रंथ फक्त प्रबोधनच करीत नाही, तर विचारी वाचकाला अंतर्मुखही व्हायला लावतो. - कुमार केतकर मानवी जीवनाप्रमाणेच बहुमिती असणाऱ्या इतिहासाचे सर्वांगीण दर्शन घडवणाऱ्या या विशाल ग्रंथाचा आवाका थक्क करून सोडणारा आहे. प्रा. सदानंद मोरे यांनी स्वातंत्र्यलढयातील निर्णायक कालखंडाची मौलिक चिकित्सा करून विलक्षण कामगिरी पार पाडली आहे. - प्रा. जे. व्ही. नाईक 'लोकमान्य ते महात्मा' हा समग्रलक्षी महाग्रंथ म्हणजे सर्वंकष सांस्कृतिक महाचर्चा असून तिला पुराव्यांची भक्कम चौकट लाभली आहे. महाराष्ट्राच्या प्रज्ञेला आणि प्रतिभेला अभिमान वाटावा, अशी ही महान साहित्यकृती आहे. - रा. ग. जाधव महाराष्ट्राच्या आधुनिक राजकीय इतिहासाची लखलखीत सप्रमाण मीमांसा करताना डॉ. सदानंद मोरे यांनी गुंतागुंतीच्या आंतरप्रवाहांची उकल व त्यांचा अनुबंध यांचा सूक्ष्म वेध घेतला आहे आणि महाराष्ट्रात गांधी हेच टिळकांचे राजकीय वारसदार ठरले, ही गोष्ट महाराष्ट्रधर्माला साजेशी व कालसुसंगत झाली, असा निष्कर्ष काढला आहे. - सदा डुम्बरे
-
Prasadachi Vani... Arthath Tuka Mhane (प्रसादाची व
तुकाराम महाराज स्वतःच्या कवितेचे स्पष्टीकरण करताना म्हणतात - 'प्रसादाची वाणी वदतो उत्तरे। नाही मतांतरे जोडियेली।।' तुकोबा ईश्वरी प्रसादाने वेदांचा भाषानिरपेक्ष अर्थ पाहू शकतात कारण संस्कृत भाषेतील वेद ज्या ईश्वराने ऋषींना दाखवला तोच ईश्वर आता तुकोबांना तोच अर्थ दाखवत आहे. फरक हा आहे कि पूर्वीच्या ऋषींनी तो त्यांच्या म्हणजे संस्कृत भाषेतून पाहिला तर तुकोबा तो आता आपल्या म्हणजे मराठी भाषेतून पाहत आहेत. संत बहिणाबाई तुकोबांच्या अभंगाला 'तुकाराम वेद' असे का म्हणतात हे आत्ता लक्षात यावे. तुकोबा हे मंत्रद्रष्टे ऋषी व त्यांचे अभंग म्हणजे तुकोबांची वाणी ही प्रसादाची वाणी आहे. प्रस्तुत संपादनात तुकोबांच्या 'प्रसादाच्या वाणी'तून निघालेले काही अभंग त्यांच्या अर्थासह वाचकांपुढे ठेवले आहेत. 'अग्रोवन' दैनिकातून 'अध्यात्म' या वाचकप्रिय सदरातून प्रसिद्ध झालेल्या अभंगातील निवडक अभंगांचा संग्रह.
-
Garja Maharashtra (गर्जा महाराष्ट्र)
"आपण महाराष्ट्रात का राहतो, देशाच्या इतिहासात महाराष्ट्राचे योगदान काय, आपल्याला महाराष्ट्राचा अभिमान का वाटला पाहिजे? ... या प्रश्नांची उत्तरे या ग्रंथातून उलगडतील. महाराष्ट्राच्या राजकीय, ऐतिहासिक, [...]