-
1965 : Bharat-Pakistan Yuddhakatha (१९६५ भारत पाकिस्तान युद्धकथा)
१ सप्टेंबर १९६५… पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील चुंब जिल्ह्यामध्ये हल्ला चढवला. शांतताप्रिय भारत देश युद्ध छेडणार नाही, अशी पाकिस्तान्यांची समजूत होती. पण ती चुकीची ठरली. त्या आक्रमणामुळे रक्तपाती युद्धाला सुरुवात झाली. हे युद्ध दुसऱ्या महायुद्धानंतरचं सर्वांत मोठं रणगाडा-युद्ध म्हणून ओळखलं गेलं, ज्यात पाकिस्तानकडील अमेरिकी पॅटन रणगाड्यांना भारतीय सैनिकांनी नामोहरम केलं. लष्करी नोंदी आणि युद्धात सर्व जागी झालेल्या सैनिकांच्या तसंच हुतात्म्यांच्या नातेवाइकांच्या मुलाखतींच्या आधारे लेखिका रचना बिश्त यांनी हाजी पीर, असल उत्तर, फिलोरा यांसारख्या लढायांची माहिती, त्यांमधले डावपेच, अचानक उभी ठाकलेली आव्हानं आणि त्यांवर केलेली मात यांबद्दलचं विश्वासार्ह कथन या पुस्तकात केलं आहे. तसंच वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या हृद्य स्मृतींना उजाळाही दिला आहे. भारतीय सैनिकांच्या अतुल्य धैर्याच्या, वीरश्रीच्या आणि शौर्याच्या कथा म्हणजेच १९६५ भारत-पाकिस्तान युद्धकथा !
-
Mandir Vyavasthapan (मंदिर व्यवस्थापन)
भक्तजनांना उत्तम सेवा देण्यासाठी शास्त्रीय व व्यावसायिक दृष्टिकोनातून केलेलं मार्गदर्शन लेखक : सुरेश हावरे भारताला अत्यंत समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. भारतभरात विखुरलेली ३० लाखांहून अधिक मंदिरं या विविधतेची साक्ष देतात, ‘भाविकांची सेवा’ या पारंपरिक मानसिकतेला व्यवस्थापन कौशल्यातील आधुनिक विज्ञानवादी भूमिकेची जोड देऊन जर मंदिरांकडे बघता आलं, तर भारतामध्ये सामाजिक-आर्थिकदृष्ट्या सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. प्रस्तुत पुस्तक हे, मंदीर व्यवस्थापन यासारख्या अभिनव विषयावरील प्रयत्नांवर प्रकाश टाकण्याचा एक सक्रीय प्रयत्न आहे. डॉ. सुरेश हावरे हे एक वरिष्ठ अणुशास्वज्ञ आणि यशस्वी उद्योजक तर आहेतच परंतु यासोबतच त्यांनी भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रतिष्ठित असे शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानाचे अध्यक्षपदही भूषवलेलं आहे. या पुस्तकात मंदिराच्या निमित्ताने रोजगार निर्मिती, सामाजिक-आर्थिक बदल, आध्यात्मिक संस्कृती, स्मारकांचं संवर्धन, गर्दीचं व्यवस्थापन इ. पासून अत्याधुनिक ‘एआय’च्या वापरापर्यंत अनेक विषयांवर समग्र आणि सखोल विचार मांडलेले आहेत. विविध विषयांतील तज्ज्ञ व्यावसायिक आणि शिक्षणसंस्था यांनी जर मंदिर व्यवस्थापनाचे विशिष्ट असे कोर्सेस आखून अमलात आणले तर मंदिरांचं प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी, सुयोग्य मनुष्यबळ निर्माण होईल. मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि वेलिंगकर व्यवस्थापन संशोधन संस्थेने हे कोर्सेस सुरुही केले आहेत. या पुस्तकाच्या निमित्ताने समाजातील विविध क्षेत्रांतील सर्जनशील जनांना, या एका वेगळ्या, नाविन्यपूर्ण विषयात रस निर्माण होईल ही अपेक्षा आहे. अभिनव मंदिर व्यवस्थापनासाठी एक मार्गदर्शक पुस्तक… मंदिर व्यवस्थापन !
-
Sam Maneksha (सॅम माणेकशा)
१९७१ च्या बांगलादेश युद्धात पाकिस्तानच्या लष्कराला १८ दिवसांत शरण आणणार्या सेनानीचं रोमहर्षक चरित्र