-
Punarvichar (पुनर्विचार)
अनेक वेळा जगण्याची निरर्थकता जाणवते. हे सर्व का व कशासाठी? आपले प्रश्नही छळून घेतात. सोलून काढतात. राक्ताबाम्बळ करून जातात. अशाच राक्ताबाम्बळ झालेल्या एका सुप्रसिद्ध लेखिकेने आपल्या निरक्षर आईला प्रश्न केला. 'अखेर जगण्याला 'अर्थ' काय?' त्या निरक्षर आईने उत्तर दिले, 'कसला आलाय अर्थ, आपण देऊ तोच अर्थ.' अखेर जगण्याला ज्याचा त्यानेच अर्थ द्यायचा असतो. हा अर्थ देत आला,शोधता आला तर जगणे 'सार्थकी' लागल्यासारखे वाटते आणि माणूस यात 'फेल' झाला की, त्याला निरर्थक वाटू लागते आणि मग मंदिरही हाउसफुल्ल होऊन जातात आणि तेवढीच गर्दी 'बार' मधेही उसळते. शेवटी प्रत्येकानं आपल्या जगण्याला 'अर्थ' ज्याचा त्यानेच द्यायचा आहे, घ्यायचा आहे, लावायचा आहे आणि शोधायचा आहे.