-
Smrutigandh (स्मृतिगंध)
"सौंदर्य आणि माधुर्य यांचे मीलनस्थळ म्हणजे गोकुळ! रस आणि रास यांची आरास म्हणजे वृंदावन ! राधा-कृष्ण यांचे नाते एक गूढ तर आहेच, शिवाय ते एक विलक्षण गारुडही आहे. युगानुयुगे कुणालाही न उलगडलेले हे कोडे! ज्याने-त्याने आपापल्या क्षमतेप्रमाणे सोडवावे. सुटेल, न सुटेल, पण दोन्हीतही आनंद! मीना जयंत कुलकर्णींनी हे गूढ उकलण्याचा प्रांजळ प्रयत्न केला आहे. राधाकृष्णातील अद्वैताची प्रचिती त्यांना आली, तिचाच हा आविष्कार! 'मधुराभक्ती' चे मनोज्ञ दर्शन घडविण्यात त्यांनी आपली कविता कसास लावली आहे. कवयित्रीचा हा आविष्कार ' मनातलं गोकुळ ' जागं करणारा आहे. वाचताना 'मोरपिस' अंगावरून फिरल्यासारखं वाटणं, हे काय कमी आहे?"