-
Dahi Disha (दाही दिशा)
रवींद्र ठाकूर लिखित ‘दाही दिशा' ही कादंबरी अरविंद नावाच्या एका वंचित युवकाची प्रतिकूल परिस्थितीशी झगडत स्वत:च्या पायावर उभारण्याच्या संघर्षाची कथा आहे. महाराष्ट्रातील खानदेश आणि मराठवाडा ही या कादंबरीची भौगोलिक पार्श्वभूमी आहे. प्राथमिक शिक्षकाचा पोर अरविंद. वडिलांची नोकरी व कुटुंब म्हणजे विंचवाचं बिर्हाड. अरविंद परिस्थितीने अकाली प्रौढ होतो नि काही बनण्याच्या ध्यासाने पडेल ते काम करत राहतो. अरविंद नाही नाही त्या गाढवांचे पाय धरत स्वत:चं जग निर्माण करत प्राध्यापक होतो. एका क्षणी लेखकाचीच आत्मकथात्मक कादंबरी वाटावी अशी अनेक साम्यस्थळे इथे आढळतात. अहिराणी भाषा खानदेश जिवंत करते तर नामांतर चळवळ मराठवाडा. वाचनीय तरी अंतर्मुख करणारी ही कादंबरी प्रत्येक वंचित तरुण-तरुणींना त्यांचीच वाटेल!
-
Dharmayuddha (धर्मयुद्ध)
महाभारतातील कर्ण या व्यक्तिरेखेने नानाविध पैलूंमुळे अनेक कलावंतांना भुरळ घातली आहे. कोणालाही लाजवेल अशी क्षमता, योग्यता आणि सामथ्र्य असूनही पदोपदी डावलला गेलेला कर्ण हे तेजोभंगाचे जिवंत प्रतीक आहे. अखंड संघर्षाने जीवनभर होरपळून निघालेल्या या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न अनेकांनी आपल्या पद्धतीने केला आहे. कवचवुंÂडले, संजयाची दिव्यदृष्टी, श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र, त्याचा गोवर्धन पर्वत बोटावर उचलण्याचा पराक्रम, द्रौपदीच्या वस्त्रहरणप्रसंगी कृष्णाकडून तिला पुरविण्यात आलेली वस्त्रे अशा अनेक चमत्कृतिपूर्ण घटनांची साखळी महाभारतात आढळते. तरीही तत्कालीन वर्णव्यवस्थेविरुद्ध वेळोवेळी बंड पुकारणारा कर्ण इतर अनेक सामथ्र्यशाली व्यक्तिरेखांच्या भाऊगर्दीत प्रकर्षाने नजरेत भरतो. या कथेतील सर्वच व्यक्तिरेखा मानवी संसारातील सुखदुःखे अनुभवत असल्याची जाणीव होते. ही माणसेही आपल्यासारखीच संसारातील समस्यांना सामोरी जाताना दिसतात. नेमका हाच दृष्टिकोन स्वीकारून आणि पारंपरिक दृष्टी निग्रहाने अव्हेरून कर्णकथेचा वेध घेणारी रवींद्र ठाकूर यांची ‘धर्मयुद्ध’ ही कादंबरी. इतर मराठी कादंबNयांमध्ये चित्रित झालेल्या कर्णापेक्षा ‘धर्मयुद्ध’मधील कर्ण मातीचे पाय असलेल्या व्यक्तिरेखांच्या अधिक जवळचा आहे.