-
Harit Vasaicha Ladha (हरित वसईचा लढा)
वेगवेगळ्या राजवटी पाहिलेली वसई आणि परिसर हा मुंबईलगतचा निसर्गरम्य प्रदेश. त्याचं हे निसर्गसौंदर्य अबाधित राखण्याचं भान परकीयांनीही ठेवलं. त्याला 'हरित संरक्षित भाग' असा दर्जा दिला. तो प्रदेश तीस वर्षांपूर्वी धनदांडगे, बिल्डर आणि सरकारी धोरणांच्या वक्रदृष्टीत सापडला. पैसा आणि दहशतीच्या जोरावर इथली हिरवी शेतं बांधकामांच्या वाळवीनं गिळंकृत व्हायला लागली. भ्रष्टाचारामुळे प्रदेशाला अवकळा येऊ लागली. या निसर्गरम्य परीसराचं अस्तित्व टिकविण्यासाठी उभी राहिली हरित वनराई संरक्षण समिती' फादर फ्रान्सिस दिब्रिटोंसारख्या धर्मगुरूंपासून सर्व थरांतील लहान-थोरांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. या लढ्याला विजय तेंडूलकर, माधव गडकरी, कुसुमाग्रज, मेधा पाटकर, ज्युलिओ रिबेरो, उल्हास जोशी अशा अनेक दिग्गजांचा पाठींबा मिळाला. या संघर्षातील एक अग्रणी मार्कुस डाबरे यांनी मांडलेली ही संघर्षकहाणी.