-
Maratha Samaj Apeksha Ani Upeksha (मराठा समाज अपेक
मराठा समाजात औदार्य, सहिष्णुता,धैर्य,बंधुभाव व सोशिकता हे गुण ठासून भरलेले आहेत. त्यामुळेच तो वडील भावाच्या भूमिकेतून इतरांना काही मिळते म्हणून कधीही खंत करत नाही. सर्वांना दिल्यानंतर आपणास मिळावे हि भावना ठेवतो. सर्वांच्या हितातच स्वतःचे हित पाहतो. सर्वांना जेवल्यानंतर तो स्वतःच्या भुकेचा विचार करतो व दुसरयाची भूक भागल्या नंतर स्वतः तृप्तीचा ढेकर देतो. सांप्रतच्या स्थितीत अनेक प्रश्नांच्या चक्रव्युहात अडकलेल्या या भावाला इतर सर्वांनी मोठ्या मनाने औदार्याचा हात देऊन त्यांच्याबरोबर चालण्याची संधी देतो. यातूनच बहुजन समाजात अभिसरणाची मंदावलेली प्रक्रिया गती व समाजासमाजातील आप-पर भाव निघून जाईल. समाज हिताची तळमळ असणारे व समाजासाठी आयुष्य वेचणारे एखादे तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठा समाजात जन्मास यावेत व मराठेतर बहुजन समाजात सर्वहारा समाजाची तळमळ असणारे एखादे श्रीमंत राजर्षि शाहू महाराज जन्मास यावेत. तरच मराठा - मराठेतर बहुजनांना न्याय मिळेल व ते गुण्यागोविंदाने राहतील.