-
Happy Lagna.com Bhag-2 (हॅपी लग्न .कॉम भाग-1)
लग्नाला पांच-सहा वर्ष झाल्यानंतर संसारात जेव्हा तोचतोचपणा वाटू लागतो, जोडीदार निरास आणि कंटाळवाणा होऊन जातो तेव्हा आपल्या या सर्वांत जवळचा नात्याला खतपाण्याची गरज लागते. हे खतपाणी म्हणजे नेमकं काय, कशाप्रकारे हे नातं पुन्हा एकदा बहरू शकतं याचं प्रभावी मार्गदर्शन या पुस्तकात आहे. विजय नागास्वामी यांनी लग्नाच्या नात्यात ऊदभवणाऱ्या अनेक नाजूक आणि जटील समस्याची ओळख करून दिली आहे. वरवर क्षुलल्क वाटणाऱ्या गोष्टी पुढे जाऊन क्लिष्ट समस्येच रूप कसं धारण करू शकतात हे त्यांनी अनेक उदाहरणामधून स्पष्ट केल आहे. नवरा व बायको यांचे भिन्न स्वभाव, वेगळ्या आवडी-निवडी, दोन टोकाची ध्येय,लुडबुड करणारे त्यांचे नातेवाईक इथपासून ते लैंगिक समस्या आणि विवाहबाह्य संबंध असा एक मोठा पट या पुस्तकात त्यांनी मांडला आहे . केवळ समाजाला घाबरून किंवा सोयींच आहे म्हणून लग्न टिकवण्यात अर्थ नाही . तुम्हाला ज्याच्या जोडीने आयुष्याचा आनंद उपभोगायचा आहे , कौटुंबिक सुख वृद्धिंगत करायचं आहे , अशा नात्याला कायम बहरत ठेवण्यासाठी वाचा....