-
Prahar Bramhastracha (प्रहार ब्रम्हास्त्राचा)
प जुनी गोष्ट नाही. १९८० आणि १९९० च्या दशकांत, भारताची व्यावसायिक राजधानी असलेली मुंबई – गुन्हेगारी टोळ्यांतील आपापसातील संघर्ष, हिंसाचार, खंडणी, अपहरण... अशा विविध कारणांनी त्रस्तलेली आणि ग्रासलेली होती. नागरिक भयग्रस्त झाले होते. कायदा व सुव्यवस्थेचे चित्र निराशाजनक होते. ...त्याचवेळी एका दृढ आणि कठोर धोरणाच्या माध्यमातून, या भीतीच्या साम्राज्याचा अंत करणारा, एक आशेचा किरण निर्माण झाला. तो म्हणजे – ज्यांनी आपल्या अभेद्य रणनीतीने गुन्हेगारी टोळ्यांचे साम्राज्य उद्ध्वस्त केले आणि हतबल झालेल्या मुंबईकरांच्या आयुष्यात पुन्हा एकदा शांततेची पहाट आणली ते मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डी. शिवानंदन! त्यांनी स्वतःच कथन केलेली मुंबईतील संघटित गुन्हेगारीच्या समूळ उच्चाटनाची ही चित्तथरारक, विस्मयजनक आणि तितकीच प्रेरणादायी कहाणी!