Mast Kalandar (मस्त कलंदर)
समाज बदलतो, समाज पुढे जातो, समाजाची प्रगती होते, त्यासाठी कारणीभूत असतात, काही अस्थिर, अव्यवहारी, क्वचित अविचारी अशी मस्त कलंदर वृत्तीची, भन्नाट माणसं ! ह्या पुस्तकामधे मी आपल्या जगातल्या, आपल्या आजूबाजूच्या पाच मस्त कलंदर व्यक्तिंचा वेध घेतला आहे. किशोर कुमार, भरत दाभोळकर, जयंत साळगावकर, निलु निरंजना गव्हाणकर आणि विजय मल्ल्या ! असामान्य अशा ह्या पाचजणांची ओळख करून घेताना, त्यांच्या मस्त कलंदर वृत्तीचा वेडा वारा आपल्यालाही स्पर्श करेल आणि केवळ नाकासमोर पाहून जगणारे आपण स्वत:मधली जगावेगळी ऊर्मी शोधायला शिकू, अशी खात्री आहे.