Udhvastha Dharmashala (उध्वस्त धर्मशाळा)
माराठी रंगभूमीवर 'उध्वस्त धर्मशाळा' हे सर्व थौंव आगळेवेगळे असे नाटक! गो. पु देशपांडे यांनी या नाटकातून एक करारी, तत्वनिष्ठ मर्किस्ट नेत्याच्या (पराभूत थोरवीची गाथा) या नाटकातून रंगवलेली आहे. राजकारण मध्ये जी तत्व प्रणाली स्वीकारलेली आहे. ती कितीही कालबाह्य व अपयशी ठरो, तिलाच निर्धाराने चिटकून राहण्याची वृत्ती व त्यातून शेवटी निर्माण होणारी अटळ शोकांतिका स्वीकारण्याची जिद्द कुलकर्णी घराण्यात तीन पिढ्यापासुन चालत आलेली आहे. प्रत्येक पिढीची तिची स्वतःची विचारसरणी आहे, ह्या विचारसरणीला सवंग लोकप्रीयातेसाठी तत्वशुन्य तडजोड ठावूकच नाही. राजकीय तत्वाप्रनालीची एकच धार तिन्ही पिढ्यात हस्तांतरित होईल असेहि नाही.बाप से बेटा सवाई या न्यायाने बापापेक्षा बेट्याचे तत्वज्ञान वेगळेच आढळते. स्वीकारलेल्या तत्वाशी प्रामाणिकता एवढी कणखर, कि नाटकामध्ये पित्याचा प्रचारसभा पुत्र उधळून लावीत असल्याचे उल्लेख आढळतात. राजकीय ध्यायाच्या प्राप्तीसाठी झालेल्या व प्रथापितांच्या कळपात जाऊ पाहणाऱ्या आपल्या पत्नी कडून अथवा प्रेयासिकडून अव्हेरले जाण्याची तयारीहि कुलकर्णी कुटुंबातील दोघांनी दाखवली आहे. समान राजकीय विचारसरणी च्या धाग्यांनी दोन जीव एकत्र येतात आणि त्या ध्येयाच्या मार्गात तडजोडीची अपरिहार्य वेळ आली, की हे दोन पुरुष आपल्या साथिदारणीचा कायमचा निरोप घेतात. बापाची शोकांतिका तीच मुलाची! रंगभूमीवरिल अने लोकप्रिय नाटकांच्या प्रकृती धर्माशी ह्या नाटकाचे नाते जुळणारे असूनदेखील हे नाटक विशेष यशस्वी झाले नाही; त्याचे कारण ह्या नाटकातील निकाल वैचारिकता. रंगभूमीवरिल ह्या नाटकाचे व्यावसायिक अपयश गृहीत धरूनही महाराष्ट्रच्या वैचारिक जगात खळबळ माजाविलेली आहे. निखळ वैचारिक नाटके मराठीत तशी दुर्मिळच!