Shetkari Jevha Jaga Hoto (शेतकरी जेव्हा जागा होतो)
या पुस्तकाचा नायक आहे पुंजाबाबा गोवर्धने. स्वातंत्र्यानंतर लगेचच झालेल्या भात उत्पादक शेतकरयांच्या लढ्याचा सेनापती. पुंजाबाबांचं हे चरित्र वाचत असताना मला अनेकदा असं वाटून गेलं. की पुंजाबाबांचं नेतृत्व माझ्यापेक्षाही अधिक गुणवत्तापूर्ण आणि कष्टाळू असं होतं. पुंजाबाबांची पार्श्वभूमी खेडेगावातील अशिक्षित शेतकऱ्याची होती,तरीही त्यांनी विचाराची मोठी झेप घेतली आणि अलौकिक कार्य करून ठेवलं. पुंजाबाबांचं हे चरित्र म्हणजे शेतकरी आंदोलनाच्या एका पर्वाचा इतिहासच आहे!