Bharat Viruddha Cheen Maitri Shakya Ka Nahi (भारत विरूद्ध चीन - मैत्री का शक्य नाही?)
भारत आणि चीन या दोन देशांतील संबंधांचा सखोल आणि समग्र वेध घेणारे, सर्वांत महत्त्वाचे पुस्तक आहे. ◆ “भारत विरुद्ध चीन” हे पुस्तक खरोखरच उत्तम आहे. यात कांती बाजपेयी यांनी भारत-चीन संबंधांचा इतिहास, राजकीय व लष्करी घडामोडी आणि दोन्ही देशांमधील संबंध कसे बदलत गेले याचं स्पष्ट आणि सोप्या भाषेत विवेचन केलं आहे. एखाद्या गंभीर विषयावर सखोल अभ्यास करून तो सामान्य वाचकांपर्यंत पोहोचवायचा असेल, तर हे पुस्तक त्याचं उत्तम उदाहरण आहे. - रामचंद्र गुहा ◆ दोन्ही देशांमध्ये सध्या तणाव वाढलेला असताना हे उपयुक्त पुस्तक अत्यंत योग्य वेळी आलेलं आहे. धोरणकर्ते आणि चीनबाबत अभ्यास करणाऱ्यांनी नक्की वाचावं असं हे पुस्तक आहे. - शशी थरूर