-
Ram Tretayugacha Mahasangram Part 2 (राम त्रेताय
अखेर त्या महायुद्धाला प्रारंभ झाला. दुंदुभी, नगारे, झांजा, शंख आदी रणवाद्यांच्या प्रचंड घोषानं सारी लंका हादरून गेली. त्यातच उभय पक्षातून जबघोष आणि आरोळ्या उठू लागल्या. एकच कल्लोळ माजून राहिला. राम हनुमानाच्या खांद्यावर वसला; आणि त्यानं धनुष्याचा टणत्कार केला. उभय पक्षाची सेना भेदरून त्याच्याकडे पाहू लागली. रामानं भराभर वेगवान तीक्ष्ण बाण सोडायला प्रारंभ केला... केवळ चार घटकात रामानं राक्षससैन्याचा पुरता विध्वंस केला. गज, पदाती आणि अश्व यांच्या मृतदेहांचा ढीग रणभूमीवर पडला. त्यामुळे क्रुद्ध झालेल्या रुद्राची ती जणु क्रीडाभूमीच असल्यासारखं वाटू लागलं. रामाच्या संहाराखातून उरलेले राक्षससेनानीही अवयव तुटल्यामुळे युद्धाला निरुपयोगी झाले होते. वानरसेनेत मात्र आनंदी आनंद पसरला होता. सगळे वानर रामाची प्रशंसा करत होते. कडवं राखीव सैन्यदलही परास्त झाल्यानंतर युद्धात स्वतः उतरण्याखेरीज रावणाला आता गत्यंतर उरलं नव्हतं. ** वाल्मीकी रामायणात वर्णन केलेले अनेक प्रसंग आज कल्पित वाटू शकतात. परंतु रामायण हे कल्पित काव्य नसून, तो आपल्या भारताचा सहस्रो वर्षांपूर्वी घडून गेलेला देदीप्यमान इतिहास आहे. रामजन्म, ऋषींचं कार्य, इंद्राचं स्वरूप आणि कार्य, गृध्र जटायूचं वास्तविक स्वरूप, वानरांची वास्तविकता, पुष्पक विमानाचं स्वरूप, रावणाचं साम्राज्य, दक्षिण अमेरिकेपासून भारताच्या पूर्वेकडच्या देशांपर्यंत घडलेलं राजकारण, आदी गोष्टी - घटना आजच्या शोधांशी ताडून बघितल्या तर आपण पाषाण किंवा ताम्रयुगातला इतिहास वाचत नसून अत्यंत प्रगत संस्कृतीविषयक इतिहास वाचतो आहोत याचा अनुभव वाचकांना मिळेल.
-
Hollywoodche Vinodveer (हॉलीवूडचे विनोदवीर)
राजेन्द्र खेर लिखित ‘हॉलिवूडचे विनोदवीर ‘ या पुस्तकात हॉलिवूडच्या माध्यमातून जगभरातील रसिकांची मनमुराद करमणूक केलेल्या आठ विनोदवीरांची चरितकहाणी आहे. प्रसिद्धी-नावलौकिक सहजासहजी किंवा अनायासे मिळत नाही. त्यासाठी जन्मत:च अभिजात कलागुण अंगी असावे लागतात. या प्रत्येकाची शैली वेगवेगळी असली... तरी प्रेक्षकांची हसवणूक हाच या विनोदवीरांचा एकमेव धर्म होता. यातील बहुतेकांनी सुरुवातीला मिळेल त्या संधीचं सोनं करत या क्षेत्रात पाय रोवला... त्यांच्या दुर्दम्य ध्यासाला अडथळे-अडचणींची पर्वा नव्हती. उलट विपरीत परिस्थितीने त्यांच्यातील कलागुणांना अलौकिक झळाळी प्राप्त करून दिली. मूकपटाचा काळ त्यांनी गाजवला तसाच बोलपटाचा काळही... हॉलिवूडला लाभलेली ही रत्नंच होती. त्यांच्या कारकिर्दीची ओळख सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. आवर्जून वाचावे असेच हे पुस्तक आहे.
-
Bindu Sarovar..
The Chinese find some ancient archaeological artifacts and ancient manuscripts in a temple in Tibet. The manuscript talks about the existence of a particular secret object, which can help one rule the world! The ambitions of the Chinese rulers take wings with this treasure of information. Coincidently they also come to know of the exact location of the object and the deadly chase begins! This thrilling chase ends at Bindu Lake! Till reaching the Bindu Lake the 'pilgrims' get many mysterious, enigmatic experiences. For example, they have to cross three gates on three different planes. Crossing each leads them into a different kind of land. These lands gate are spectacular in their imagery. Surviving the chase and conquering many obstacles and many dangers along the way the hero of the novel, Vikram Bhargav, manages to reach the Bindu Lake and places the object there. That object is supposed to get neutralized after reaching Bindu Lake!
-
Ram Aryavartache Punarutthan Bhag 1 (राम आर्यावर्त
वाल्मिकी रामायणात वर्णन केलेले अनेक प्रसंग आज कल्पित वाटू शकतात , परंतु रामायण हे कल्पित काव्य नसून तो आपल्या भारताचा सहस्रो वर्षाचा दैदिप्यमान इतिहास आहे . रामजन्म, ऋषींचं कार्य, इंद्राचे स्वरूप आणि कार्य ,जटायूचं वास्तविक स्वरूप ,वानरे,पुष्पक विमान ,रावणाचे साम्राज्य ,दक्षिण अमेरिकेपासून भारताच्या पूर्वेकडच्या देशांपर्यंत घडलेलं राजकारण ,आदी गोष्टी ,घटना आजच्या शोधांशी ताडून पहिल्या तर आपण पाषाण किंवा ताम्रयुगातला इतिहास वाचत नसून अत्यंत प्रगत संस्कृतीविषयक इतिहास वाचत आहोत याचा अनुभव देणारे पुस्तक
-
Udayan (उदयन)
‘कथासरित्सागर’ या सोमदेव शर्मा यांनी रचलेल्या संस्कृत ग्रंथात उदयनकथा विस्ताराने कथन केली आहे. राजेन्द्र खेर यांनी उदयन-वासवदत्ता यांची हीच भावमधुर प्रेमकथा उत्कटतेने रंगवली आहे. कलासक्त उदयन संगीतसाधना आणि विलासात मग्न होतो. त्याचीच परिणती वत्सदेशाच्या पतनात होते. पांडवानंतरच्या पाच पराक्रमी पिढ्यांनी अबाधित ठेवलेल्या सम्राज्याला पराजयाचे ग्रहण लागते. सम्राटपद गमावलेला उदयनराजा वीणावादन आणि नाट्यशालेत मश्गूल असतो. त्याचे वीणावादन इतके कर्णमधुर असते, की त्या स्वर्गीय वादनामुळे श्रोतेच नव्हे, तर पशुपक्षी, मदोन्मत्त हत्ती आणि निसर्गसुद्धा मंत्रमुग्ध होतो. अवंतीनरेश प्रद्योत आपली रूपसुंदर कन्या वासवदत्ता हिला वीणावादन शिकविण्यासाठी उदयनचं कुटिल डाव रचून अपहरण करतो. वीणेच्या प्रशिक्षणकाळात घडलेल्या सहवासातून उभयतांचं परस्परांवर प्रगाढ प्रेम बसतं. कलेच्या साक्षीने त्यांची प्रेमाराधना पुâलत जाते. वत्सदेशाचे महाअमात्य यौगंधरायण यांच्या मनात पराजयाचं शल्य असतंच, त्यात उदयनच्या अपहरणाच्या व्यथेची भर पडते. ते प्रतिज्ञा करतात... पुढे काय काय वेगवान घटना घडतात ते जाणून घेण्यासाठी ही उत्वंâठावर्धक कादंबरी अवश्य वाचायला हवी. ही कथा जशी उदयन-वासवदत्ता या युगुलाची आहे, तशीच साम्राज्याच्या पुनस्र्थापनेची प्रतिज्ञा घेणारे चाणाक्ष
-
Bindusarovar
बिन्दु सरोवर राजेन्द्र खेर वास्तवाकडून अद्भुततेकडे नेणारी आणि प्रतिक्षणी उत्कंठा वाढविणारी अनोखी कादंबरी! वैश्विक संदर्भ असलेली अस्सल भारतीय अद्भुतरम्य रहस्यमय कादंबरी--