-
Kameru (कामेरू)
मराठीतील एक श्रेष्ठ कादंबरीकार म्हणून श्री. ना. पेंडसे परिचित आहेत. कोकणचा निसर्गसमृद्ध प्रदेश त्यांनी आपल्या लेखणीतून समर्थपणे उभा केला आहे. कथा, कादंबरी, नाटक, आत्मचरित्र या विविध वाङ्मयप्रकारात त्यांनी चौफेर आणि सशक्त लेखन केले आहे. कोकणातील माणसं, वेगवेगळी ठिकाणं आणि संपन्न समुद्रकिनारा याचं सर्जन म्हणजे पेंडसे यांचं एकूण लेखन आहे. घटना, प्रसंग, निवेदन, संवाद, सहज भाषाशैलीत जीवनानुभव त्यांच्या लेखनात सहजपणे येऊन जातो. रंजनात्मकतेच्या पलीकडे जाऊन स्वत:ला जाणवलेली अनुभवसृष्टी ते आपल्या लेखनातून उभी करतात. जीवनातील नाट्य रेखाटताना निवेदनात तटस्थ तरीही जीवनवेधी अशा चैतन्ययुक्त, जिवंत निवेदनातून जीवनाचे नाट्यमय दर्शन घडवतात. त्यांच्या ‘कामेरू’ या कादंबरीचा विषय कामभावना असला तरी वैविध्यपूर्ण विषय यात येतात. ग्रामजीवनापासून सुरू होणारी ही कथा शहरी जीवनात स्थिरावते. कामवासनांचे, सुखदु:खांचे चित्रण विलक्षणतेने येते. आदिम कामेच्छांचे चित्रण अस्वस्थ करते. अनीतिमानतेवरही प्रकाशझोत टाकते. एकूणच कामभावना आणि त्याभोवती येणारे आदी विषय पेंडसे सूक्ष्मपणे ‘कामेरू’मधून रेखाटतात.
-
Prayaschitth (प्रायश्चित्त)
सतराव्या शतकात घडणारं आणि हेस्टर प्रिन या स्त्रीच्या आयुष्याभोवती गुंफलेलं हे कथानक. आपल्या मुलाच्या बापाची ओळख पटवू न शकल्यानं हेस्टर अघोरी अपमान आणि सामूहिक हिंसेला बळी पडते. हेस्टरची भूमिका तिला काळाच्या पुढची नायिका ठरवते. अनैतिक वागण्याचं सूचक म्हणून तिला तिच्या शरीरावर एक खूण बाळगण्याची शिक्षा होते. ही खूण पुढे तिचा न बदलता येणारा भूतकाळ आणि मानहानिकारक भविष्यकाळ यांचंही प्रतीक ठरते.
-
Elgar. (एल्गार)
शुद्ध माणसाचा शोध हा चिरंतनाचा शोध आहे. अर्थात शुद्ध माणूस याचा अर्थ ‘सामाजिक जीवना’शी फारकत घेतलेला माणूस नव्हे. ‘माणूस’ हा शेवटी घडतो त्यात सामाजिक परिस्थितीचा वाटाही असतोच, असं मानणाऱ्या श्री. श्री. ना. पेंडसे यांची ‘एल्गार’ ही कादंबरी हिंदू व मुसलमान अशा दोन मित्रांविषयी आहे. रघू आणि कादर या दोन सुशील जिवांची प्रेमकथा. त्यांचा राजकीय स्वार्थानं कसा बळी घेतला, त्याचं वास्तव चित्रण करणारी ही कादंबरी.
-
Ek Hoti Aaji (एक होती आजी)
कोकणाच्या पार्श्वभूमीवर व्यक्तिचित्रे साकार करण्यात ख्यातकीर्त असलेले महान कादंबरीकार श्री. ना. पेंडसे यांची ही कादंबरी. आजीचे लग्न तिच्या पंधराव्या वर्षी, तिच्याहून पस्तीस वर्षांनी वयाने मोठया असलेल्या बिजरावाशी होते. तेव्हापासून तिला, नातवंडे, पणतवंडे होईतोपर्यंतच नव्हे तर ती अखेरचा श्वास घेईतोपर्यंतचा आजीचा अवघा जीवनपट या कादंबरीत उलगडून दाखविलेला आहे. ती प्रेमळ, परोपकारी, निःस्वार्थी, निःपक्षपाती होती, हे तर खरेच. या तिच्या स्नेहार्द स्वभावामुळे ती सर्वांच्या सदैव स्मरणात कशी राहिली याचे अनेक चित्ताकर्षक घरेलू प्रसंग लेखकाने नवरा, दीर, भाऊ, भावजय, दिराची मुले, सुना, जावई आदी नातेसंबंधांभोवती मोठ्या तन्मयतेने गुफलेले आहेत. तरीसुद्धा मनात प्रश्न येतोच आजी कशी होती-? लग्नापूर्वी ओढवलेल्या `त्या’ प्रसंगामुळे आजीने आपले वैवाहिक आयुष्य ज्या तर्हने भोगले ते योग्य होते काय? आणि सरतेशेवटी आजीने स्वतःहून कबुलीजबाब दिलेले `ते’ अमानुष कृत्य सद्भावनेपोटी केलेले का होईना, कितपत क्षम्य आहे? याचा शोधाबोध प्रत्येक वाचकाला घ्यावासा वाटेल-
-
Kalndar (कलंदर)
'ह्त्या' कादंबरीचा 'कलंदर' हां पुधील भाग;- पण किती तरी वेगळा. 'ह्त्या' तील आत्मकथानाची शैलीच केवळ इथे बदलली आहे, असे नाही, तर पेंडसे यांच्या कालेने आपल्या विकासाचा पुढील टप्पा गाठला आहे. निसर्ग येथे कथेच्या भावगुणाशी एकजीव आणि म्हणून अधिक समृध्हा झाला आहे.; व्यक्तिचित्रणाचे सामर्थ्य तसेच रसरशीत आहे. पण ते अधिक विविध रुपे धारण करते आहे; कथानाकाची गुंफण अधिक सूक्ष्म आणि म्हणून अधिक वेधक झाली आहे. 'एल्गार','हृदयपार' गारंबीचा बापू' ,'ह्त्या' या आपल्या पूर्वीच्या कादंबर्यात पेंडसे यांनी रंगविलेले जीवनाचे चित्र अधिकाधिक सुक्ष्म व् संमिश्र होत गेले आहे. 'कलंदर'मध्ये तर पाचात्य संगीतातील अनेक वाद्यांच्या स्वरामेलाची आठवां व्हावी, इतके ते संमिश्र, चढ़ते आणि अनेक बिंदुभोवती रुंजी घालुनाही एक केंद्राकडे झेप घेणारे व् अनेक पाताल्यान्वर विकास पावुन्देखील एकात्म व् सुसंवादी आहे.
-
Hatya (हत्या)
श्री.ना. पेंडसे यांच्या कादंमबरीविश्वात 'ह्त्या' ही कादंमबरी विशेषत्वाने उठून दिसते; ती तिच्यातील वेगळेपणाने. वास्तावाच्य्या पातळीवरील, तर्कसंगत आणि ह्रदय अशी ही कथा पेंडसे यांनी आपल्या कादाम्बरिसाठी निवडली आणि पेंडसे यांची कादंबरी खर्या अर्थाने जीवनाशी पहिल्यांदा अधिक समरस झाली;परिस्थितीने आबाळलेला, शारीरिक व्यंगामुळे अव्हेरलेला आणि गरिबीने, पिचलेला असा हा कुठल्याही अर्थाने तत्कालीन 'नायक' न शोभणारा, पौगंडावस्थेतील मुलगा या कादंबरीचा नायक झाला ही तत्कालीन वाडःमयाभिरुचिच्या चौकटीत न बसणारी गोष्टी होती. आपल्या वेदनेची आणि परिस्थितीने दिलेल्या चटक्यांची खालच्या सुरात दू:खार्त अशी मान्दानी करणारी आणि काळजाला हात घालणारी ही कादंबरी आहे. पेंडसेविश्वातील पुढील कादंबर्यांच्या विकासाची बिजी या कादंबरीत सुप्त्पने विखुरलेली दिसतात. 'ह्त्या' च्या निमित्ताने पेंडसे यांनी मराठी कादंबरीतील 'हीरो' ची प्रतिमा पार बदलवून टाकण्याचे जे धाडस केले, त्यासाठी तरी या कादंबरीचे मोल आपण मान्य करायला हवे.
-
Haddapar (हद्दपार )
श्री.ना. पेंडसे यांनी सांगितलेले वर्णन - "या कादंबरीविषयी आमच्या मास्तरांच्या विद्यार्थ्यांत ब-यापैकी लेखनकला असलेला मीच - यामुळं प्रस्तुत कथेच्या लेखनाची जबाबदारी माझ्यावर आली. माझ्या तोटक्या लेखणीनं मी ती पार पडली आहे. मास्तरांच्या महात्मतेचं दर्शन घडवायला ही कथा अपुरी पडणारी असेल तरी मला फिकीर नाही. जोवर येथील दुर्गेश्वर आणि मास्तरांच्या स्वर्गवासामुळे ओका झालेला बुरोडीच्या खाडीवरील राजेवाडा हयात आहे, तोवर येथील निर्जीव जगसुद्धा मास्तरांविषयी काय सांगायचं ते सांगेल." मास्तरांविषयी हद्दपार ही श्री.ना. पेंडसे यांची कादंबरी वाचकाला अंतर्मुख करून जाते.
-
Octopus (ऑक्टोपस )
ऑक्टोपस हे एक जलचर प्राण्याचं नाव आहे. त्याला आठ नांग्या असतात. या नांग्यानी तो आपले भक्ष्य पकडत असतो. याचं नाव सहेतुकपणे या कादंबरीला योजले आहे. प्रसिद्ध लेखक श्री. ना. पेंडसे यांची चारू पंडीत, मीना मोडक, गुरुनाथ हिंदकेकर या प्रमुख व्यक्तिरेखा असलेली ही कादंबरी वाचनीय असून श्री. ना. पेंडसेंच्या उत्कृष्ट कादंबरीच्या यादीत मोलाची भर टाकणारी आहे.
-
Tumbadche Khot Khand 1 Ani 2( तुंबाडचे खोत खंड-1 आणि २)
मराठी भाषेतील श्रेष्ठ कादंबरीकार ही श्री. ना. पंडसे यांची आजची पदवी आहे. रसिकांची व श्री. पेंडसे यांचीही आजवर समजूत अशी होती की 'रथचक्र' ही त्यांची सर्वोत्कृष्ट कादंबरी. 'एल्गार'पासून सुरू झालेल्या त्यांच्या कादंबरीयात्रेचा अखेरचा मुक्काम म्हणजे 'रथचक्र'! आणि असे वाटत होते की त्यानंतर स्वभावधर्मानुसार ते कादंबरीलिखाण करतच रहातील पण 'रथचक्र' नंतर काही भव्यतर आलोक असेल, अशी त्यांना व रसिकांना बहुतकरून कल्पनाही नसणार. - पण मराठी कादंबरीचे भाग्य असे की 'रथचक्र' नंतर आता आणखी एक महाकाय अशी लोकविलक्षण कादंबरी पेंडसे यांनी लिहिली आहे, 'तुंबाडचे खोत'. मुळात या दुखंडी कादंबरीचा आवाकाच प्रचंड आहे. तुंबाडच्या खोत घराण्याच्या ज्ञात इतिहासाची सुरुवात होते ती ब्रिटिश अमदानीच्या पहिल्याच दशकात आणि त्या इतिहासाची समाप्ती होते ती त्याच अमदानीतच्या अंतिम दशकात, स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रसंगी. म्हणजे जवळपास सव्वशे वर्षांचा हा प्रदीर्घ कालखंड आहे. तुंबाडकर खोतांच्या आद्य पूर्वजांपासूम विद्यमान वंशजांपर्यंत या इतिहासाची व्याप्ती आहे. या चित्रविचित्र इतिहासाच्या मार्गक्रमणात पदोपदी असंख्य स्वभावविशेष अशा व्यक्ती आणि त्या व्यक्तींच्या स्वाभाविक संघर्षातून निष्पन्न होणार्या अनिक घटना भेटत रहातात. त्यात पुन्हा एक व्यक्ती दुसर्या व्यक्तीसारखी नाही. एक घटना दुसरीसारखी नाही. एकूणएक सर्वच व्यक्ती व घटना स्वत्वविषेष अशा. आणि काळ सव्वाशे वर्षे असला तरी स्थळ मात्र एकच: तुंबाड आणि तुंबाडचा परिसर. तुंबाडच्या खोतांच्या कुलवृतांताची ही बखर ही एखाद्या रम्याद्भुत आणि उग्रभीषण कहाणीसारखी आहे.
-
Tumbadache Khot Khand - 3 Ani 4 ( तुंबाडचे खोत खंड
श्री. ना. पेंडसे यांनी एक महाकाय अशी लोकविलक्षण कादंबरी लिहीली. ती म्हणजे तुंबाडचे खोत. मुळातच या द्वीखंडी कादंबरीचा आवाका प्रचंड आहे. तुंबाडचे खोत घराण्याच्या ज्ञात इतिहासाची सुरुवात होते ती ब्रिटीश अमदानीच्या पहिल्याच दशकात आणि त्या इतिहासाची समाप्ती होते ती त्याच अमदानीतच्या अंतिम शतकात, स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रसंगी म्हणजे जवळपास सव्वाशे वर्षाचा प्रदीर्घ कालखंड आहे. तरी स्थळ मात्र एकच : तुंबाड आणि तुंबाडचा परिसर.
-
Garambicha Bapu (गारंबीचा बापू)
प्रसिद्ध लेखक श्री.ना. पेंडसे यांची गारंबीचा बापू ही एक लोकप्रिय कादंबरी. हर्णे बंदराच्या परिसरातच वाढलेली ही कादंबरी. हर्णे, मुरुड, आंजर्ले, मुर्डी ही बंदरपट्ट्याची गावं. दापोली इथला रमणीय परिसर या निसर्ग आणि भावणारी माणसं. या कादंबरीतल्या सर्व व्यक्ती आणि प्रसंग काल्पनिक असले तरी जिवंतपणे प्रत्ययाला येतात.