-
Tin Dagadachi Chul (तीन दगडाची चूल)
2001सालातील लक्ष्मीबाई टिळक राज्य पुरस्कार तसेच भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार यासारख्या सन्माननीय पुरस्काराने गौरवलेले हे पुस्तक वाचकाला अस्सल जीवनानुभवाचा प्रत्यय देते. भटक्या विमुक्त जमातींच्या अपार दु:ख, दैन्य, हालअपेष्टांची ओळख करून देणारे हे पुस्तक. गावोगाव भटकणार्या कुटुंबातील दारिद्र्यात होरपळणार्या मुलीचा विवाहानंतर समाजकार्यकर्ती म्हणून घडलेला विकास, त्याचा प्रवास हा या पुस्तकाचा सशक्त गाभा. नवा जीवन संस्कार घडवणारं मौलिक आत्मकथन.