Shyamini (श्यामिनी)
'श्यामिनी'ही शूर्पणखेच्या उध्वस्त जीविताची कहाणी आहे तशीच ती जानकीच्या-कनवाळू, हळव्या मनाच्या, भावनावश होणारया-व्यथेचीही. मिथकरुपात असलेल्या या कहाणीची, तारा वनारसे 'श्यामिनी'मध्ये पुनर्निर्मिती करत आहेत. कालाच्या गहन धुक्यातून मिथकाला वरती आणत,त्या कहाणीतले काव्य आणि कारुण्य अलवारपणे उलगडत,तिच्या मूलस्वरुपातला अदृश्य अवकाश अधिक भावगर्भ करत,तिला स्वतःची अशी तर्कसंगत दिशा देत,तारा वनारसे श्यामिनीचे आणि जानकीचे अविस्मरणीय दर्शन इथे घडवतात. तसेच 'अर्यमा'सारख्या नव्या मिथकाला जन्म देतात. मिथकाचा विस्तार करणारे लेखन आढळत असते; मात्र मिथकाच्या पुनर्निर्मितीचा योग सर्जनशील लेखकाच्या लेखनात भेटतो. तसा दुर्मिळ,आनंददायक अनुभव 'श्यामिनी' वाचताना येत राहतो.