Netaji Subhash

By (author) Shriram G. Pachindre Publisher Chinar

भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या धगधगत्या रणकुंडात अनेक देशभक्तांनी उडी मारली. त्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशमुक्तीसाठी केलेले अथक प्रयत्न म्हणजे एक स्वतंत्र लढाच आहे. उच्चविद्याविभूषित सुभाष बाबूंनी आझाद हिंद सेनेची स्थापना करून देशवासीयांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी हाक दिली. परदेशी नेत्यांची मदत घेण्याचे धाडस त्यांनी दाखविले. त्यांच्याबद्दल भारतातच नव्हे, तर अन्य देशांतही आदर व्यक्त केला जातो. त्यांच्या राजकीय वाटचालीतून त्यांची जीवनगाथा सितांशू दास यांनी ‘नेताजी सुभाष’ मधून कथन केली आहे. त्याचा मराठी अनुवाद श्रीराम पचिंद्रे यांनी केला आहे. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील एका तेजस्वी पर्वाचा वेध यातून घेतला आहे.

Book Details

ADD TO BAG