-
Kanbakth Nindar (कमबख्त निंदर)
साहित्यिक नरेन्द्र मोहन यांची ही आत्मकथा त्यांचं लौकिक, व्यावसायिक जीवन उलगडते. आई-वडील, दोन भाऊ अशा कुटुंबासमवेतचं बालपण...तेराव्या वर्षी फाळणीमुळे अमृतसरला निर्वासितांच्या छावणीत स्थलांतर...या घटनेने बदललेले आयुष्य आणि भावविश्व...अर्थात हा प्रवास ते चित्रित करतात निंदर (त्यांची आई त्यांना लाडाने ‘निंदर’ असं म्हणत असे) या व्याQक्तरेखेच्या माध्यमातून...त्यांच्या मनाला पडलेला पीळ, अस्वस्थता व्यक्त करताना ते निंदरचा आधार घेतात आणि या आत्मकथेला कलात्मकतेच्या पातळीवर नेऊन ठेवतात...निंदर ते साहित्यिक नरेन्द्र मोहन हा महत्त्वपूर्ण प्रवास यात येतो...फाळणीच्या आणि १९७५च्या आणीबाणीच्या वेदना या आत्मकथेतून जाणवतात...लौकिक आणि व्यावसायिक जीवनातील वादळांचा, आनंदक्षणांचा, त्या त्या वेळच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीचा अभ्यासपूर्ण, व्यामिश्र आविष्कार
-
The Missing (द मिसिंग)
शाळकरी डर्बी मॅककॉर्मिथ आणि तिच्या दोन खास मैत्रिणी. जंगलात पार्टीचा बेत आखतात. पार्टीसाठी प्रत्यक्ष जंगलात पोहचतातही. पण तिथं एक जीवघेणा थरार त्यांची वाट पाहत असतो. कुणीतरी खुनशी मारेकरी एका बाईचा खून करतो. या खुनाची साक्षीदार असलेली डर्बी आणि तिच्या मैत्रिणी कसाबसा जीव वाचवून पळतात. या घटनेच्या तब्बल पंचवीस वर्षानंतर डर्बी एक धाडसी पोलीस अधिकारी झालेली असते. तिच्याकडं एका हत्यासत्राची सुत्रं सोपवली जातात. मध्यरात्री गायब होणाऱ्या बायका आणि त्यांचा मागमूसही मागं न ठेवणाऱ्या एका सायको किलरला शोधण्याचं काम सुरू होतं. आणि त्याचवेळी तिला भविष्यातलं अराजकही थांबवायचं असतं. या शोध मोहिमेत डर्बीचा वर्तमानकाळ तिच्या भुतकाळातल्या अनुभवांशी थरारक नाळ जोडू लागतो.
-
Mi Bhartiya (मी भारतीय)
इतिहासाची आणि मानवाच्या आदिमतेची पाळमुळं शोधणारं खातं म्हणजे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खातं. या खात्यात पुरातत्त्ववेत्ता म्हणून काम करताना के.के.मुहम्मद यांनी विलक्षण अनुभवांची शिदोरी जमा केली आहे. अयोध्येतलं वादग्रस्त उत्खनन असो की ताजमहल परिसरातला व्यापारी संकुल उभारणीचा तत्कालीन मुख्यमंत्री मायावतींचा घाट उलथवून लावणं असो, मुहम्मद यांचा कार्यकाळ आव्हानांनी भरलेला आहे. यात अगदी चंबळच्या खोऱ्यातील डाकूंचा सामना करत वटेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचेही प्रसंग आहेत. त्यामुळं हे आत्मकथन जणू भारतीय इतिहासाची सफर घडवत एका संशोधकाचा प्रवास मांडतं.
-
Anuchit (अनुचित)
माजी युएस मरीन कॅप्टन अनुराधा भगवती यांचं हे विलक्षण अनुभवकथन. आपल्या कठोर शिस्तीच्या भारतीय पालकांपासून मनाने दुरावलेली अनुराधा सैन्यात दाखल झाली. पण अमेरिकन नौदलातला स्त्री-पुरुष भेद आणि पुरुष सैनिक-अधिकाNयांकडून होणारं स्त्री सैनिकांचं लैंगिक शोषण, या गोष्टींनी तिला अस्वस्थ केलं. तिची सैन्यातील कारकीर्द संपल्यानंतर स्वान या संस्थेमार्पÂत तिने यासंदर्भात आवाज उठवला. परिणामी अमेरिकी सैन्यातील जाचक अटीही बदलल्या गेल्या आणि अमुलाग्र बदल घडला आणि लढाईसंदर्भातील महिला अधिकाऱ्यांवरील बंदी उठवण्यात आली. अनुराधा यांच्या अनुभवांचं आणि त्यांच्या लढ्याचं हे दाहक दर्शन.
-
Amap Pani (अमाप पाणी)
द टाइम क्विन्टेट मालिकेतील हे चौथं पुस्तक. मरी कुटुंबातली मुलं आता मोठी झाली आहेत. सँडी आणि डेनीस ही जुळी मुलं तशी सर्वसामान्य मुलांसारखीच. पण पौगंडावस्थेतले हे दोघे आई-वडिलांच्या प्रयोगशाळेत असताना अनवधानाने एका चालू प्रयोगात ढवळाढवळ करतात आणि काळाच्या सीमा ओलांडून अतिप्राचीन काळातल्या निर्मनुष्य वाळवंटात जाऊन पोचतात. हा काळ असतो ‘नोहा आणि त्याचे जहाज’ या बायबलमधील पौराणिक गोष्टीतला...या काळाची वाट हरवलेल्या मुलांना पुढे अनेक बऱ्यावाईट अद्भुत प्रसंगांना सामोरं जावं लागतं. यातला अप्रतिम कल्पनाविलास वाचकांना खिळवून ठेवतो.
-
Kalpatavaril Surkuti (कालपटलावरील सुरकुती)
वैज्ञानिक अद्भुतिकांमधील अफलातून कथानक म्हणजे हे पुस्तक. चार्ल्स वॉलेस वडिलांचा शोध घेत एका राक्षसी ग्रहावर पोहचतो. तिथलं सर्व जीवनमान ‘इट’ या आक्रमक शक्तीचे गुलाम बनले आहे. या आक्रमक शक्तीपासून पृथ्वीची आणि पर्यायाने आपल्या वडिलांचीही सुटका करण्यासाठी चार्ल्सचा संघर्ष सुरू आहे. या संघर्षात त्याची बहीण मेग, तिचा मित्र केल्विन आणि तीन अद्भुत व्यक्तीरेखांची त्याला साथ मिळते आहे. या अद्भुत व्यक्तीरेखा चार्ल्सला मार्ग तर दाखवतातच, पण आपल्या कारनाम्यांनी कथानकात रंगतही भरतात.
-
Vegane Kalnara Graha (वेगाने कलणारा ग्रह)
द टाइम क्विन्टेट या पंचकडीतील हे तिसरं पुस्तक. पंधरा वर्षांच्या चार्ल्स वॉलेसपुढं नवं आव्हान ठेपलं आहे. ते आव्हान आहे, मॅड डॉग ब्रॅन्झिलोच्या विनाशकारी विचारांपासून पृथ्वीला वाचवण्याचं. या कामी चार्ल्सला सोबत लाभलीय एका एकशिंगी अद्भुत घोड्याची. चार्ल्सच्या या कालप्रवासात त्याला इतिहासातल्या व्यक्तीरेखांच्या आत प्रवेश करून भविष्यात विनाशकारी ठरणाऱ्या विचारांना थोपवायचं आहे. आशा आणि विश्वासाच्या रूजवणीचा हा चार्ल्सचा प्रवास एका अद्भुतिकेला जन्म देणारा आहे. ज्यात त्याची बहीण मेग कायथिंग करून चार्ल्सचं मनोबल वाढवण्यासाठी सज्ज आहे.
-
Anukul Kaal (अनुकूल काळ)
द टाइम क्विन्टेट या पंचकडीतील हे पाचवं पुस्तक. पॉली ओ’कीफ नुकतीच तिच्या आजी-आजोबांच्या घरी राहायला आलेली असते. तिचे आजोबा-आजी म्हणजे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ अॅलेक्स आणि केट मरी. पॉली तिच्या वर्तमानकाळापासून तीन हजार वर्षे आधीच्या भूतकाळात भरकटत जाते. ‘बहुतेक तो अपघात नसावाच’ असं तिला दोन ड्रूइड्स सांगतात. ते तिला सांगतात : ‘जेव्हा जेव्हा काळाचं द्वार उघडतं, तेव्हा तेव्हा त्याला निश्चित कारण असतं’. पॉली आणि तिचा गंभीर आजारी मित्र झॅकरी, भूतकाळात गेल्यावर लगेच काळाचं दार बंद होतं, तेव्हा त्यामागचं कारण स्पष्टपणे समजू लागतं. काळाचं दार पुन्हा खुलं होईपर्यंत अशा निराशाजनक काळात पॉली स्वत:ला आणि झॅकरीला जिवंत ठेवू शकेल का? ते दार उघडलं तरच ते घरी परत येऊ शकणार आहेत.
-
Daratil Vadal (दारातील वादळ)
ए विंड इन द डोअर अर्थात दारातील वादळ हे द टाइम क्विन्टेट मालिकेतील दुसरं पुस्तक. मेग मरी आणि चार्ल्स वॉलेसच्या धाडसाची ही नवी कहाणी. पण यात मेगचा मित्र कॅल्विनचीही प्रमुख भूमिका आहे. या गोष्टीत काल्विन मेगचा पाठीराखा आणि सोबती म्हणून खऱ्या अर्थाने समोर येतो. पृथ्वीच्या विनाशावर टपलेले इक्थ्रॉय आणि प्रोगिनॉस्कीसच्या मदतीनं मेग मरी आणि चार्ल्स वॉलेसनं त्यांच्या विरोधात दिलेल्या लढ्याची ही गोष्ट. प्रत्येक वेळी, जेव्हा एखाद्या ताऱ्याचा मृत्यू होतो, तेव्हा आणखी एका इक्थ्रॉयनं लढाई जिंकलेली असते.
-
Benjamin Graham (बेंजामिन ग्रॅहॅम)
वॉरन बफे हे नाव ‘शेअरबाजारात अभूतपूर्व यश मिळवणारा मनुष्य ’ म्हणून जगप्रसिद्ध आहे. अशा वॉरन बफेचा गुरू असलेला माणूस म्हणजे काय जबरदस्त प्रकार असेल! बेंजामिन ग्रॅहॅम हे त्याचं नाव. विलक्षण गरिबीतून वर आलेल्या ग्रॅहॅमनं आपल्या आईनं शेअरबाजारात केलेली गुंतवणूक पूर्णपणे बुडताना अनुभवली. अफाट बुद्धिमत्ता आणि तर्कबुद्धी यांच्या जोरावर ग्रॅहॅमनं वैयक्तिक पातळीवर ही परिस्थिती साफ बदलून तर टाकलीच; पण शिवाय यशस्वी गुंतवणूक कशी करायची याचे वर्ग घ्यायलाही सुरुवात केली. भरपूर पैसे कमावून झाल्यावर तितक्याच शांतपणे ग्रॅहॅम गुंतवणुकीच्या विश्वातून आणखी लोभ न बाळगता बाहेर पडला. सगळ्यांना आपल्या ‘मार्जिन ऑफ सेफ्टी’ या संकल्पनेचा फायदा मिळावा आणि गुंतवणुकीच्या संदर्भातले बारकावे समजावेत यासाठी ग्रॅहॅमनं लिहिलेली पुस्तकं अजूनही ‘बेस्टसेलर’ मानली जातात. त्याचं ‘द इंटेलिजंट इन्व्हेस्टर’ हे पुस्तक तर गुंतवणुकीचं बायबल म्हणूनच ओळखलं जातं. उलथपालथींनी भरलेलं अतिशय नाट्यमय आयुष्य जगलेल्या ग्रॅहॅमची ही कहाणी.
-
The Cut Out Girl (द कट आउट गर्ल)
दुसऱ्या महायुद्धातील ज्यूंवरील अत्याचार म्हणजे मानवी क्रूरतेची परिसीमा. या क्रूरतेला आपली पोर बळी पडू नये म्हणून लिनच्या पालकांनी तिला दुसऱ्या कुटुंबाकडे सोपवलं. फोस्टर कुटुंबानं तिला लपवलं आणि नाझीवादापासून तिचं संरक्षणही केलं. पण कालांतरानं तिला फोस्टर कुटुंबापासून दूर व्हावं लागलं. त्यानंतरच्या तिच्या आयुष्यात अनेक स्थित्यंतर झाली. तिनं मानवी विकृतीच्या कित्येक तऱ्हा अऩुभवल्या. फोस्टर कुटुंबाचा नातू अर्थात बार्ट व्हॅन एस तिच्या या हेलावून टाकणाऱ्या आयुष्याची गोष्ट सांगता सांगता दुसऱ्या महायुद्धानं घडविलेल्या वेदनादायी विध्वंसावरही प्रकाश टाकतात.
-
Vitamin Jindagi (व्हिटामिन जिंदगी)
ही कहाणी आहे एका दुर्दम्य इच्छाशक्तीची. वयाच्या चौथ्या वर्षी पोलिओनं एक पाय निकामी केला, पण पोलिओ त्या मुलाच्या इच्छाशक्तीवर प्रहार करू शकला नाही. आयुष्यानं दिलेलं हे आव्हान त्या मुलानं पेललं. आणि आपल्या समस्येला संधीत रूपांतरित केलं. त्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाची ही यशोगाधा. शरीराला जशी व्हिटामिन्सची गरज असते, तशीच मनाला आशा, प्रेरणा आणि साहसासारख्या व्हिटामिन्सची गरज असते. हेच व्हिटामिन्स ललित कुमार यांचं हे पुस्तक आपल्याला पुरवतं.
-
Krushnakanya (कृष्णकन्या)
गेली साठहून अधिक वर्षं रत्नाकर मतकरींचं कथालेखन अविरत चालू होतं. परीकथांपासून सुरू झालेली मतकरींची कथा, सर्वाधिक रमली, ती ‘गूढकथा’ या कथाप्रकारात. अडीचशेहून जास्त कथांद्वारे मतकरींनी गूढकथांना अफाट लोकप्रियतेबरोबरच राजमान्यताही मिळवून दिली. आणि तरीही, त्यांचं सामाजिक कथालेखनही लक्षणीय राहिलं. या वास्तववादी सामाजिक कथांमधून मतकरी समाजातल्या विसंगतींविरुद्ध, अन्यायाविरुद्ध सातत्यानं आवाज उठवत राहिले. शैली कोणतीही असो, मतकरींनी कायम शोधला, तो माणसातला ‘माणूस.’ म्हणूनच नियतीची चेष्टितं, काळ, मृत्यू अशा अनादि-अनंत संकल्पनांची चित्तवेधक रचना करीत वाचकाला गुंगवून टाकणाऱ्या मतकरींच्या वैविध्यपूर्ण कथा चिरस्मरणीय ठरल्या. ‘कृष्णकन्या’ ही मतकरींचा परीसस्पर्श असलेल्या अशाच अनोख्या कथांची अमूल्य भेट. मतकरींच्या शेवटच्या अप्रकाशित कथांपैकी निवडक कथा प्रथमच पुस्तकरूपात आणणारा संग्रह म्हणूनही ‘कृष्णकन्या’चं महत्त्व अनन्यसाधारण असंच.
-
Te Ekaki Ladhale (ते एकाकी लढले)
नाझी-व्याप्त फ्रान्समधील ब्रिटिश सिक्रेट एजंट्स स्टार बंधुची ही खरी कहाणी. जॉर्ज स्टार आणि जॉन स्टार हे सख्खे भाऊ चर्चिलने नाझींविरोधात स्थापन केलेल्या एसओईमध्ये सामील होऊन फ्रान्सच्या वेगवेगळ्या भागात काम करत होते. अर्थात त्यांना एकमेकांच्या आयुष्यात काय घडत आहे याची जराही कल्पना नव्हती. तो त्यांचा अगदी एकाकी संघर्ष होता. मदतीच्या सगळ्या स्रोतांपासून लांब राहून ते अगदी शत्रूच्या गोट्यात शिरून लढले. पकडले गेल्यास त्यांचा बचाव करणारंही कुणी नव्हतं. पण तरीही स्टार बंधुंनी इतिहासाच्या पानावर एका अशक्य कामगिरीची नोंद केली. त्यांच्या या कामगिरीचा अनेक ऐतिहासिक दस्तावेजातून घेतलेला हा सांगोपांग आढावा.
-
Shine Bright (शाइन ब्राइट )
प्रत्येकाला उद्योजक बनण्याची इच्छा असते. पण, केवळ याच मार्गानं तुम्ही प्रभाव टाकू शकता का? एखादा उद्योजक ज्या गोष्टी करू शकतो त्याच तुम्ही नोकरीच्या कक्षेत राहूनही करू शकत असाल तर? ‘शाइन ब्राइट’ अशाच काही प्रेरणादायी प्रवासांचा लेखाजोखा सादर करतं, जे एकाचवेळी कष्टसाध्यही आहेत आणि समाधान देणारेही आहेत. कोणत्याही नोकरीत तुम्ही ‘अडकलेले’ नसता, तुम्हीही बदल घडवू शकता– एक ‘उद्योजक’ बनू शकता...हा विश्वास हे पुस्तक रूजवतं.
-
Bhartiya Sainik (भारतीयसैनिक)
पालकांच्या इच्छेखातर आयआयटीची परीक्षा दिलेला अर्जुन मनातून भारतीय नौदलात जाण्याचं स्वप्न बाळगतो आहे. एनडीए की आयआयटी या गोंधळात पडलेल्या अर्जुनला शेवटी त्याचं कुटुंबच पाठिंबा देतं. त्याच्या स्वप्नांची वाट मोकळी होते. आणि अर्जुन एनडीएत दाखल होतो. एनडीएच्या प्रशिक्षणानंतर तो सैन्यातील एका गुप्त आणि महत्त्वपूर्ण मिशनचा भाग होतो. त्याच्यासाठी देशसेवा बजावण्याची ही नामी संधी असते. पण तिथल्या वातावरणाने आणि काही घडामोडींनी त्याच्या पुढे अनेक नवी आव्हानं उभी राहतात. आणि देशसेवेत राहण्याच्या त्याच्या इच्छाशक्तीवरच परिणाम होतो. या वैचारिक दुविधेतून तो तिथून बाहेर पडायचा निर्णय घेत असतानाच दोनशे प्रवाशांना घेऊन जाणार एक विमान अपहृत होतं...आणि अर्जुनपुढे पुन्हा नवा पेच निर्माण होतो.
-
Where Egles Dare (व्हेअर ईगल्स डेअर)
कडाक्याची, गोठवून टाकेल अशी थंडी... अशा थंडीत एका रात्री ब्रिटिश स्पेशल फोर्सेसच्या सात पुरुषांबरोबर एका स्त्रीचा समावेश असलेली टीम जर्मनीतल्या उंच पर्वतराजीच्या प्रदेशात पॅराशूटनं उतरवली जाते... या टीमसमोरचं टार्गेट असतं - ` कॅसल ऑफ द ईगल’ नावाचा, शिरकाव करण्याच्या दृष्टीनं अतिशय दुर्गम, कठीण, अशक्यप्राय आव्हान वाटावं असा एक किल्ला आणि त्यातलं जर्मन सीक्रेट साQव्र्हसचं मुख्यालय... त्यातही या टीमसमोर एक मिशन असतं ते म्हणजे विमान कोसळल्यामुळे नाझींच्या तावडीत सापडलेल्या एका अमेरिकन जनरलची या किल्ल्यातल्या कैदेतून सुटका करणं... त्याची चौकशी करणाऱ्या नाझी अधिकाऱ्यांच्या हातात एक फार महत्त्वपूर्ण अशी गुप्त योजना पडू नये म्हणून... मात्र, ब्रिटिश स्पेशल फोर्सेसचं हे मिशन सुरू झालं नाही तोच या टीमचे सदस्य बळी पडत जातात आणि मिशन गुंतागुंतीचं होत जातं... रहस्यमय, उत्कंठापूर्ण अशा गाजलेल्या चित्रपटाचं उगमस्थान असलेली, दुसऱ्या महायुद्धाच्या काळातली अॅलिस्टर मॅक्लिनची एक रोमांचकारक साहसकथा...
-
Karunecha Swar (करुणेचा स्वर)
22 मे 2016, या दिवशी डॉ.किरण बेदी यांची पॉंडिचेरीच्या राज्यपालपदी निवड झाली. राज्यपालपदाची सुत्रे हाती घेत असताना त्यांचं ध्येय पक्कं ठरलं होतं. पॉंडिचेरीला संपन्न राज्यात परिवर्तित करणं आणि तिथल्या जनतेची सेवा करणं. हे ध्येय साध्य करताना राज्यपाल हा नामधारी असतो, हा आजवरचा रबर स्टॅम्प त्यांनी मिटवून टाकला आणि नवा इतिहास घडविला. सामान्य जनतेसाठी राजभवनचे दरवाजे खुले केले. त्यांच्यातील करुणेनं जनतेचं मन जिंकलं. करुणेला दुबळेपणाचं लक्षण मानणाऱ्यांना करुणेचं महत्त्व पटवून दिलं. डॉ.किरण बेदी यांच्या करुणामयी कारकिर्दीचा परिपाक म्हणजेच हे पुस्तक.
-
Aaji Ajobanchya Potaditlya Goshti (आजी आजोबांच्या
2020 सालात कोरोना व्हायरसनं साऱ्या जगाची दारं बंद केली. राष्ट्रीय टाळेबंदी जाहीर झाली. इकडे शिगावला आजी-आजोबांच्या घरी नातवंडांसह कमलु आजीचा प्रवेश झाला. नातवंडांनी या काळात आजीआजोबांना अनेक कामांमध्ये हातभार लावला. पण त्याचसोबत त्यांच्यासाठी गोष्टींचं एक अफलातून जग खुलं झालं. राजा-राणी, जादुमंतर, प्राण्यांचं गमतीदार जग या गोष्टींच्या रूपाने मुलांनी अनुभवलं. आणि त्यांची टाळेबंदीतील सुट्टी खऱ्या अर्थानं समृद्ध करणारी ठरली. एकदा हाती घेतल्यावर संपवूनच खाली ठेवावं, असं दमदार, खुसखुशीत पुस्तक.