-
Je Dekhe Ravi(जे देखे रवि)
प्रकाशक मंडळी पुस्तक खपले असा शब्दप्रयोग करत नाहीत,ते चालेले असा शब्दप्रयोग करतात.मला भविष्य कथनातले थोडे फार कळते.पण ते माणसांबद्दल.पुस्तकाची पत्रिका असते का? ती प्रकाशक नक्कीच मांडत असणार.सदर पुस्तक थोडे फार हलेल,चालेल कि जागेवरच बसून राहील हे येणारा काळच ठरवणार आहे.प्रकाशनाचे मुद्दल त्याला परत मिळो हि सदिच्छा व्यक्त करतो.नफा झाला तर मी हजर आहेच.
-
Arab Jag (अरब जग)
युद्ध आणि क्रांती या गोष्टी समाजाला ढवळून काढणाऱ्या असतात. त्यांचे परिणाम अल्पकालीन नि दीर्घकालीन असतात. त्यात भाग घेणाऱ्या लोकांनाच त्याचे चटके बसतात असे नाही, तर रणांगणापासून दूर असणाऱ्या लोकांनाही त्याचे चटके बसतात. जे युद्धाचे परिणाम तेच क्रांतीचेही होतात. सहा अरब जगातल्या क्रांत्यांचे चित्र हेच दाखवून देत होते. इस्लामी जगात प्रस्फोट घडविणारे काय विचार प्रवाह आहेत, त्या प्रस्फोटांची मूळे कुठे आहेत, अरब तरुण जगाच्या काय आकांशा आहेत. शिवाय अरब जगातील क्रांतिकारक घटनांची ताजी, सत्य, रंजक नि विस्मयकारक माहिती मराठी वाचकाला मिळावी, या हेतूने सदर ग्रंथाची निर्मिती केली. त्याचे निश्चित स्वागत करतील
-
Prashnaparva (प्रश्नपर्व)
प्रश्न माणूस टूटत चलल्याचे प्रश्न अजूनही स्त्री ब्र्हण हत्येचे
-
Ladak (लडाक)
मला हायकींगची फारच आवड आहे. हायकींगप्रमाणे लडाखला जायची माझी फार इच्छा होती. मला जायचं होतं. तेव्हा आत्माराम परब यांचं नाव सुचवलं गेलं. मला फार कुतूहल वाटलं आणि मी लगेच लडाखला जायचं नक्की केलं. माझ्या मानतील इच्छा वयाच्या चौरयाहत्तराव्या वर्षी पुर्ण झाली. या सहलीत आम्हाला घरगुती वातावरणात वावरल्याच आनंद मिळाला. आत्माराम बरोबर केलेली ती सफर अविस्मरणीय अशीच होती. नंतर मी ईशा टुर्स बरोबर सहकुटुंब भुतानलाही जाऊन आलो. आणखी बरयाच देशात मला आत्माराम बरोबर जायचं. आंतरराष्ट्रीय किर्तीचे न्युरो स्पायनल तज्ज्ञ डॉ. प्रेमानंद रामाणी
-
Bakhar Sambhaji (बखर संभाजीची)
महाराष्ट्राच्या पावन भूमीवरील एक अनोखे तीर्थक्षेत्र म्हणजे श्री क्षेत्र तुळापूर. भामा ,भीमा आणि इंद्रायणी या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेल्या या क्षेत्राने महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वपूर्ण घटना पाहिल्या आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासावर उमटलेली लखलखती, देदी प्यमान विद्युतरेखा म्हणजे छत्रपती संभाजीमहाराज. आपल्या अल्प कारकिर्दीतही सं भाजी महाराजांनी बजावलेल्या चतुरस्त्र कामगिरीला तोड नाही. मुघलांपासून ते पोर्तुगिजांपर्यंत स्वराज्याच्या सर्व शत्रूंना आपल्या समशेरीची जरब बसणारे शंभूराजे कवी प्रतिभेच, संवेदनशील राज्यकर्ते होते. या तेजस्वी पुरुषाची ओजस्वी गाथा सांगणारया या पुस्तकात जिथे संभाजी महाराजांनी वीरमरण पत्करले त्या तुळापूर परिसराचा इतिहास, भूगोल, संस्कृती यांचा वेधही घेतलेला आहे.
-
Kuthe Na Kuthe (कुठे ना कुठे)
'कुठे ना कुठे' नित्यनूतन अनुभवांनी भरलेलं हे जीवन प्रवाही असतं. ते एका ठिकाणी न थांबता वळणावळणाने पुढे, पुढे जात असतं. अशाच ब-याचशा वळणांवर भेटलेले जाणवलेले आणि भावलेले हे माझ स्मरणबंध खचितच तुम्हालाही, आयुष्यातील वाटांवर घेऊन जातील. आपण सदर पुस्तकात निश्चत भावेल, असा विश्वास वाटतो.
-
Thembatl Abhal (थेंबातलं आभाळ)
आजच्या सुखवस्तू जगात, वस्तू सुखी आहेत, आणि माणसं मात्र दु:खी; नेमकं काय चुकतंय? आंनदी असणं आणि आनंदाचा मेकअप यातला फरक माणसं विसरली आहेत का? अविरत परिश्रमाने, आई- बाबांनी जे आयुष्य उभ केलं, त्याची किंमत रेडीमेड चंगळवादी युगातल्या मुलांना केव्हा कळणार आहे? सुखामागे धावता धावता दमून गेलेली आजची घरं कधीतरी अंतर्मुख होणार आहेत की नाही ? संवेदनांना साद घालणारा एक तरल अनुभव - 'थेंबातल आभाळ !"
-
Ekantacha Doh (एकांताचा डोह)
कोलाहातून कधीतरी दूरच्या आतल्या गावात जावसं वाटतं ना ? शहरी गजबजाटातून मनातल्यालाल कौलारु घरात नारळी पोफळीच्या बागेत बिलगणा-या गारव्यात कधीतरी सर्वांच्या नकळत गुणगुणावसं वाटतं न द्या टाळी! अशाच मनाच्या गार सावलतीच असतो तो एकांताचा डोह! तिथे कविता, गाणं, नृत्य, चित्र इतकंच काय ह्या एकांत डोहाकाठीच आपण आपल्याला नव्याने सुचत जातो.