-
Prarabdhachi vat (प्रारब्धाची वाट)
ईश्वराने हातात लेखणी घेऊन आयुष्यात चढ उतार लिहावेत आणि एखाद्या चित्रपटात घडत असणाऱ्या घटना प्रत्यक्षात कुणाच्या आयुष्यात घडत असतील तर याचाच अनुभव प्रारब्धाची वाट ह्या कादंबरी मध्ये वाचकांना येईल.गिरीश आणि अमृता दोघेही संस्कारी आणि सुशिक्षित पण नियतीने त्यांच्या माथी घटस्फोटित असा शिक्का मारला आणि दोघेही खचून गेले.संसार आणि लग्न ह्या शब्दांवरील देखील विश्वास उडून गेलेले हे दोघे पुन्हा आयुष्याकडे छान नजरेने पाहतील का ??वेगवेगळ्या वाटेवरून चालणाऱ्या ह्या दोघांच्या प्रारब्धाची वाट एक होईल का ??एकदा वाईट अनुभव आल्याने त्यांनी मनाशी केलेला ठाम निश्चय तसाच राहील की त्यांचे मतपरिवर्तन होईल ??दोघेही पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकून जातील की फक्त एक मित्र म्हणून आपले दुःख वाटून आपले मन एकमेकांच्या जवळ हलके करून आपापल्या वाटेने निघून जातील.?या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी ही कादंबरी तुम्हाला वाचायला हवी ,वाचन करत असताना तुम्ही त्यात गुंग होऊन जाल हे नक्की. ✍️ श्री.आनंद पिंपळकर ( सुप्रसिध्द वास्तूतज्ञ ज्योतिर्विद विद्या वाचस्पती )
-
Aadikal Ek Itihas : Part 2 (आदिकाल एक इतिहास : उत्तरार्ध)
आदिकाल : एक इतिहास' हे पुस्तक प्राचीन भारताच्या इतिहासाच्या अभ्यासासाठी एक महत्त्वपूर्ण स्रोत आहे. हे पुस्तक वाचकांना भारताच्या समृद्ध भूतकाळात घेऊन जातं आणि प्राचीन भारताच्या विविध पैलूंची माहिती देतं. केवळ पौराणिक कथा नाही तर त्यामागील शास्त्र, इतिहास इत्यादी गोष्टी व्यापक दृष्टीने हे पुस्तक समजावून सांगतं. श्री. वझलवार यांनी यात सोप्या भाषेत आणि कथारुपात, आकर्षक पद्धतीने अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे. भारताची सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख जपणारं हे पुस्तक एक अमूल्य ठेव आहे. आपल्या समृद्ध भूतकाळाची ओळख करून देत आपल्या संस्कृतीचा वारसा जतन करणारं हे पुस्तक नक्कीच संग्रही हवं.
-
Bharat Satya Satva Swatva (भारत सत्य सत्व स्वत्व)
श्री. अभिजित जोग लिखित ‘भारत : सत्य, सत्व, स्वत्व’ हा ग्रंथ म्हणजे हजारो वर्षांपूर्वी भारतीयांनी केलेल्या ज्ञानोपासनेचा व भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंचा धावता आढावाच होय. ‘ज्ञान विज्ञान योग’ असे प्रस्तुत ग्रंथाचे वर्णन करता येईल. यात तत्वज्ञान, अध्यात्म, भाषा ( संस्कृत ), वैद्यक, खगोलशास्त्र, गणित, धातुशास्त्र या ज्ञान-विज्ञानाच्या सर्व आयामांचा भारतातच उदय झाल्याचे सप्रमाण विवेचन केलेले आढळते. सखोल चिंतन, ‘ना मूलं लिख्यते किंचित’ हे असे धोरण, भारत म्हणजे जगातला पहिला ज्ञानाधिष्ठित समाजाचा देश, वेदोपनिषदे व सभ्यतेची मानवी मूल्ये भारतात निर्माण झाली तेंव्हा इतर देशात अज्ञानांधःकारच होता हे ठासून सांगणारा हा ग्रंथ होय. ही अशी एकमेवाद्वितीय ज्ञानपरंपरा आठवून भारतीयांना ‘उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत’ असे सुचविणारा हा मौलिक ग्रंथ होय. गो. बं. देगलूरकर नामवंत विद्वान आणि भारतीय कला व स्थापत्यशास्त्राचे सर्वमान्य अभ्यासक विषयाचा आवाका आणि मांडणी याबाबतीत हे पुस्तक ज्ञानकोषीय पातळीवर जाते. इतका मोठा विषय हाताळताना बारीक-सारीक तपशीलही सुटणार नाही याची काळजी घेण्यात लेखक अभिजित जोग पुन्हा एकदा यशस्वी ठरले आहेत. तरीही, प्रवाही भाषेमुळे हे पुस्तक अत्यंत वाचनीय झाले आहे. भारतवर्षाची खरी ओळख पुनर्स्थापित करणारे हे दर्जेदार पुस्तक सर्व प्रकारच्या वाचकांना आवडेल असा मला विश्वास वाटतो. नीलेश ओक विद्वान संशोधक आणि लेखक
-
The Legend Of Bahirji Naik Part 2 (द लिजंड ऑफ बहिर्जी नाईक भाग २)
मराठा स्वराज्य १६६५ : प्रचंड मोठ्या मुघल फौजेने पुरंदरला वेढा घातला आहे अफगाणी सरदार दिलेरखान आणि मोठा नावलौकिक असलेले राजपूत सरदार मिझोराजे जयसिंग त्यांचे नेतृत्व करत आहेत. नुकतेच पंख फुटू लागलेल्या मराठा साम्राज्याला सगळ काही संपल्यासारखे वाटत होते. शिवाजी राजे सगळ्या बाजूंनी वेढले गेले होते, यातून चतुराईने कसा मार्ग काढता येईल याबद्दल राजे आपल्या सल्लागारांशी चर्चा करत आहेत. पण इतिहासाची पुनरावृत्ती होणारच. मुघल आणि आदिलशाही फौजांनी, गुलाम-सरदार असलेल्या सिद्धी जौहरच्या नेतृत्वाखाली आधीच स्वराज्याला वेढा घातला होता. आणि खुद राजे पन्हाळगडावर अडकले होते. आणीबाणीच्या वेळी धाडसी उपाययोजना करणे आवश्यक असते. रात्रीच्या अंधाराआड, थेट शत्रूच्या नाकासमोरून त्यांची सुटका करण्यासाठी एक अत्यंत धोकादायक योजना आखली गेली. तिथून निसटून ते विशाळ गडावर कसे पोहोचले याची चित्तथरारक कथा आणि त्या अनुषंगाने येणारी, मुघल फौजेला नेस्तनाबूत करून टाकणाऱ्या उंबरखिंडीच्या लढाईची कथा. शिवाजी राजांचे प्रसिद्ध गुप्तहेर किंवा गुप्तहेर खाते असलेल्या बहिर्जी नाईक यांच्या नजरेतून ही कथा उलगडत जाते. जे काही घडले ते, जगाने कधीच न पाहिलेल्या गनिमी काव्याचे एक सर्वात मोठे उदाहरण बनून गेले.
-
Yamunatiri anande (यमुनातीरी आनंदे)
सामाजिक विषयांबरोबरच या कथासंग्रहात गूढकथा आणि विनोदी कथा हे दोन प्रकारही समाविष्ट केले आहेत. त्यामुळे हा कथासंग्रह म्हणजे सकाळी उठल्यानंतर देवासाठी फुलं वेचत असताना आपण तबकात बकुळीची सुगंधित फुलं, फारसा वास नसलेली पण नियमित फुलणारी तगर, अजिबातच सुगंध नसलेली पण आकर्षक रंगाची जास्वंद, एखादी दूर्वांची जुडी, तुळशीच्या चार मंजिऱ्या, या सगळ्या स्त्रीलिंगी फुलांच्या जोडीला तो अनंत किंवा तो चाफा अशी आरास रचतो, तसा हा कथासंग्रह विविधरंगी, विविधगंधी आहे.