-
Mi Boltoy (मी बोलतोय)
डॉ. सुनील शशीकांत काळे यांनी या पुस्तकातून स्वतःचा आणि पर्यायाने मानवाचा शोध घेतला आहे. भक्ति, श्रद्धा आणि समर्पणाच्या मार्गावर चालत द्वैतातून अद्वैताचा प्रवास करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. ते म्हणतात, परब्रम्हालाच बहु व्हावे असे वाटले आणी त्याने सृष्टि निर्माण केली. परब्रह्म स्वतःच ईश्वररूपात सर्व प्राणीमात्रांच्या अंतरंगात स्थिरावले. या रूपाचा त्यांनी शोध घेतला आहे. विश्वाच्या, अनंताच्या प्रवासाकडे, नराच्या नारायणाकडे झालेल्या प्रवासाकडे त्रयस्थपणे पाहण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. धर्म, सत्य, सत्कृत्ये, ईश्वर, जीवन यांचाही हा शोध आहे. पुस्तकाच्या अखेरीस काही कवितांचा समावेश केला आहे.
-
Schizophrenia Ek Navi Janeev (स्चीझोफ्रेनिया एक नव
स्किझोफ्रेनिया एक नवी जाणीव : मनाच्या रथाला इंद्रियांचे घोडे असतात. ते लगाम खेचून नीट चालविले तर ठीक नाहीतर किंवा घोडेच उधळले तर मन आणि त्याचा सारथी माणूस, सगळेच कोलमडून जातील. विचार इकडे, भावना तिकडे, वर्तन आणखी कुणीकडे अशा व्यक्तिमत्त्वभंग अथवा छिन्नमनस्कता यालाच स्किझोफ्रेनिया म्हणतात.
-
Belbhasha (बेलभाषा)
सुमन बेलवलकर यांना परभाषिकांना मराठी शिकवताना जे स्वभाषेचे आणि महाराष्ट्राच्या संस्कॄतीचे दर्शन झाले ते त्यांनी मोठया खेळकरपणाने छोटया छोटया लेखातून टिपले आहे.
-
Brahmashrichi Smaran Yatra (ब्रह्मर्षीची स्मरण यात
समाधीमध्ये मंगळ, गुरु, शनि या ग्रहांवर विज्ञानमय कोषाने जाऊन तेथील स्थिती अगोदर प्रसिध्द केली व ती अवकाश यानांनी मानल्यामुळे जागतिक कीर्ति लाभलेले, दिव्य दृष्टी असलेले साक्षात्कारी संत. प्राचीन भारतीय विद्यांचे संशोधक म्हणून भारतात मान्यता पावलेले. "स्वयंभू" ग्रंथाने धूर्त, मुत्सद्दी भीम व महाभारताची ऎतिहासिकता सिध्द करणारे व ज्योतिर्गणिताने तारखा ठरविणारे. "वास्तव रामायण" ग्रंथात पंधरा सहस्त्र वर्षांचा इतिहास मांडून रामाच्या जीवनातील तारखा ज्योतिर्गणिताने सिध्द करणारे. उपनिषदे, पातंजल योग व गीता यावरील विज्ञाननिष्ठ निरुपणे प्रकाशून अध्यात्मिक अधिकार सिध्द करणारे. "पुनर्जन्म"- या ग्रंथातून त्या सिध्दान्ताची वैज्ञानिक मांडणी करणारे. ख्रिस्ताचे हिंदुत्व, प्रतापसूर्य थोरले बाजीराव पेशवे, ‘स्वा. सावरकर - मूर्तिमंत गीता, पहिले नि एकमेव’, ‘दास मारूती ? नव्हे; वीर हनुमान !’ वैदिक विज्ञान व वेदकालनिर्णय, संगीत दमयंती परित्याग, युगपुरूष श्रीकृष्ण, तेजस्विनी द्रौपदी अशी सुरस १६ पुस्तके लिहून जगापुढे सत्य मांडणारे. पुण्यातील प्रथितयश सर्जन डॉ. प. वि. वर्तक यांच्या सिध्दहस्त लेखणीतून ५२ वर्षांच्या अध्यात्मसाधनेचे अनुभव अक्षरबध्द झालेले आत्मचरित्र ‘ब्रम्हर्षीची स्मरणयात्रा’.