-
Prasangik Prasad (प्रासंगिक प्रसाद)
उत्तम आणि वाचनीय पुस्तक आहे. पुस्तक वाचताना आपल्याला जाणवेल की हे प्रसंग आणि घटना आपल्याही आयुष्यात कधीतरी घडून गेल्या आहेत. प्रसादजींची भाषा सहज, ओघवती आहे आणि त्यामुळे ते आपल्यासमोर बसून बोलत आहेत,असे वाटते. निरिक्षण उत्तम आहेच पण निरिक्षणाचे लेखन समर्थपणे केले आहे. आपल्या घरात घडणारे प्रसंग, सौभाग्यवतीबरोबर होणारे संभाषण, परदेशातून कधीतरी येणारी कन्या, ती काही दिवसच रहाणार म्हणून जाणवणारी उद्विग्नता, नेहमीच्या कामवाली बाईने दिलेली दुसऱ्या प्रांतातील बदली कामवाली, बुफेमधील गमतीदार प्रसंग, सर्व आपल्या अगदी जवळचं वाटावं,असं आहे. चांगल्या वाचनाच्या शोधात असणाऱ्यांनी हे पुस्तक ( अर्थात विकत घेऊन) जरुर वाचावे आपल्या मित्रमंडळींना काही विशेष प्रसंगी भेट द्यायलाही हरकत नाही
-
Chaitanycha Zara ( चैतन्याचा झरा)
पुलंनी असे म्हटले कि, आपल्या समाजाची स्थिती मोठी चमत्कारीक झाली आहे. आपल सोवळ सुटलंय आणि ओवळ सापडत नाहीये... एका वाक्यात केवढा तरी आशय! आपण विचारमग्न!…।प्रस्थापित समाजव्यस्थेला विरुद्ध करणारी पुरोगामी, परिवर्तनवादी लेखन वाचताना त्यातली तर्कसंगत भूमिका लगेचच मान्य करतो...तथापि कधी अन्य वैचारिक वाड्मय संतानी सोपा करून सांगितलेला वेन्दांत, माणसात वेद्नात,सत्भाव जागा करणारी कीर्तन,प्रवंचन ऐकताना पुन्हा संभ्रमात पडतो. 'हे खरे कि ते खरे कि ते खरे कि ते खरे!'हि काव्यपंक्ती आठवू लागते.विलास राजे याचा हा लेखसंग्रह वाचताना त्याचा युक्तिवाद,बिनतोड आहे, असच म्हणावस वाटेत.त्यांनी दिलेले साहित्यातील,पुराणातले,इतिहासातले संदर्भ खूप काही बोलतात.विलास राजे एख्यादा क्षणी तरल,हळवं आणि हृदयस्पर्शी लेखन करतात.अतिशय जमून आलेला हा लेखसंग्रह आहे. वाचक मनोमन खुश होईल.राजेच्या या वैचारिक,ललित,संदर्भसमृद्ध लेखनाची सर्वत्र उत्त्तम लेखन घेतली जाईल.या पुस्तकाचे स्वागत होईल याची खात्री वाटते.
-
Kathakumb (कथाकुंभ)
'चैतन्याला जपण्यापेक्षा त्याला फुलवायला हवं देवत्वाला पुजण्यापेक्षा त्याला शोधायला हवं' असं म्हणणारे विलास राजे…परिवर्तनवादी विचारांचे ते खंदे पुरस्कर्ते आहेत. ग्रामीण जीवनाचे अस्सल रंग कथेचा माध्यमातून, शब्दचित्रांतून ते सादर करतात, आणि वाचकाला आपलंसं करतात …. प्रस्तुतचा 'कथाकुंभ' हा विलास राजेंचा पहिलावहिला कथासंग्रह तो वाचताना वाचकाला लेखकाचा रुपात प्रगल्भ, जाणता सारस्वत भेटतो… त्याच वेळी त्याचं हे पहिलंच पाऊल आहे , याचीही काही ठिकाणी जाणीव होते. या लेखकाच पर्दापण मात्र दमदार आहे… चांगली कथा कोणती? जी वाचकाचा मनाला स्पर्श करते, त्याच्या हृदयाशी संवाद साधते. त्याचा पूर्वस्मृती ताज्या करते…. कधी निखळ , मनोरंजन करते. हसवते. वाचकाची दोन घटका करमणूक करते….तर कधी कथेचा माध्यमातून जीवनमुल्याचा सूचकतेने, कलात्मकतेने पुरस्कार करते… विलास राजे म्हटल्याप्रमाणे 'या कथा हसवतील, चिमटे काढतील, तर कधी अंतमुर्खही व्हायाला लागतील.' प्रस्तुत संग्रहात अनेक कथा अशा आहेत कि, त्या सत्यकथा वाटाव्यात, अस्सल वाटाव्यात…. अशा नमुनेदार व्यक्तिरेखा, या कथातून समोर येतात कि वाचक त्यांना विसरणार नाही; प्रतिकूलतेवर स्वार होणाऱ्या झुंजार, लढाऊ! तर कधी अत्यंत सोशीक, प्रांजळ! उदार मनाच्या! दुसऱ्याचा दुख वाटून घेणाऱ्या… आशावादी, प्रयत्नवादी! प्रस्तुत संग्रहातली काही पात्र, म्हणूनच मस्त आहेत.ती कुणी तत्वज्ञ नाहीत.भाष्यकार नाहीत;पण त्याचा वागण्या- बोलण्यातून शहाणपणाच्या चार गोष्टी ती सांगतात… आपण लेखकाला धन्यवाद देतो.शुभेच्छा देतो.