-
Baluchya Avasthantarachi Diary (बाळूच्या अवस्थांतर
भूतकाळाची काळी, काटेरी, टोकदार सावली वर्तमानावर पसरलेली असते- आपल्याला जरी भान असलं, नसलं, तरी! वर्तमानातल्या घटनांची, व्यक्तीच्या स्वभावाची, वर्तनाची मुळे खूप खोलवर आत आत भूतकाळात रुजलेली असतात. आपली आपल्यालाही त्याची जाणीव नसते. प्रोफेसर भांगरे, त्यांची आई, बायको आणि 3 मुली यांची गोष्ट म्हणजे ही कादंबरी. भांगरे यांच्या वर्तमान काळामध्ये काही गोष्टी घडत आहेत. त्यांना वाटत की भूतकाळा मध्ये पण अशा गोष्टी घडल्या आहेत आणि त्याची मुळे वर्तमान काळामध्ये रुजली गेलेली आहेत. मुली ,त्यांची प्रेम प्रकरण, लग्न आणि त्यांचा सामाजिक प्रभाव, जातिव्यवस्था, मध्यमवर्गीय माणूस आणि समाजाला घाबरून जाऊन तो करत असलेला विचार म्हणजे ही कादंबरी. रंगनाथ पठारे यांच्या पुस्तकांची खास बात म्हणजे त्याची शीर्षक आणि पूर्ण पान भरून असणार एकच वाक्य. तरीही ही वाक्यं कुठे कंटाळवाणी अजिबात होत नाहीत.